
भारत पाकिस्तान सामन्यात खेळाडूंनी केलेली एक चूक आयुष्यभरासाठी जखम राहते. त्यामुळे या सामन्यात चूक घडू नये यासाठी खेळाडू प्रयत्नशील असतात. भारत पाकिस्तान सामना फक्त मल्टिनेशन स्पर्धेतच होतो. त्यामुळे हा सामना क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी ठरतो. भारत पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारीला कोलंबोच्या प्रेमादासा स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा फिरकीपटू उस्मान तारीकची खूपच स्तुती होत आहे. भारतीय फलंदाजांना अडचणी आणेल असं सांगितलं जात आहे. त्यात गेल्या महिन्यात भारताची फिरकीविरुद्धची खेळी काही खास राहिली नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. असताना उस्मान तारीकबाबत विकेटकीपर फलंदाज इशान किशनला विचारलं गेलं. तेव्हा त्याने आपल्या शैलीत त्याचं उत्तर दिलं.
इशान किशनने नामिबियाविरूद्धच्या सामन्यात आक्रमक खेळी केली होती. या सामन्यात फिरकी गोलंदाजाचा सामना करताना इशानचं रौद्र रूप दिसलं होतं. असं असताना इशान किशनने सांगितलं की, गेरहार्ड इरास्मसचा सामना करणे ही काय तारिकची तयारी म्हणून नाही. भारतीय संघाने आधीच तयारी केली आहे. इशान किशनने सांगितलं की, ‘आम्ही आधीच तयारी केलेली आहे. आम्ही फक्त चेंडू पाहून आमचा नैसर्गिक खेळ खेळण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. जर बॉल मारण्यासारखा असेल तर आम्ही नक्कीच मारू. आम्हाला आमच्या ताकदीवर विश्वास लागेल. ‘ इशान किशनने आपल्या वक्तव्यातून स्पष्ट केलं की भारताची तयारी पूर्ण आहे. आता फक्त सामन्यात त्याची योग्य अमलबजावणी करणं गरजेचं आहे. आम्ही काही व्हिडिओ पाहतो आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या गोलंदाजीचा सामना करावा लागेल याची कल्पना येते, असंही तो पुढे म्हणाला.
🚨 Big words from Ishan Kishan at the presser 🚨
“We’re already prepared for Usman Tariq. We’ll play the ball, not the bowler. And if it’s in our zone, it’s going out of the park.” 💥
Fearless intent. Clear plan. No mind games just pure attacking cricket. 🇮🇳🔥
#INDvsPAK… pic.twitter.com/5jCx1kXBgC— Ankit Malik (@ankitmalik22) February 13, 2026
भारतीय संघाची फिरकीविरुद्ध कमकुवत बाजू दिसून आली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ भारताला अडचणीत आणेल असं बोललं जात आहे. पाकिस्तानच्या ताफ्यात अबरार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, सईम अयुब आणि उस्मान तारिक या सारखे फिरकीपटू आहेत. त्यामुळे फिरकीचा सामना करून मोठी धावसंख्या करण्याचं आव्हान असणार आहे. दुसरीकडे, इशान किशनला संजू सॅमसनसोबतच ओपनिंग करावी लागेल असं दिसत आहे. कारण अभिषेक शर्मा फिट नसल्याचं कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितलं आहे. त्यात संजूचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे.