AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : आऊट झाल्यावर चुकीचं वागणं अंगाशी, ICC ने केएल राहुलला धडा शिकवला!

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना अत्यंत रंगतदार स्थितीत आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांसह फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केल्यानंतर भारतीय फलंदाजही चोख उत्तर देत आहेत.

IND vs ENG : आऊट झाल्यावर चुकीचं वागणं अंगाशी,  ICC ने केएल राहुलला धडा शिकवला!
KL Rahul
| Edited By: | Updated on: Sep 05, 2021 | 4:06 PM
Share

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना इंग्लंडमधील ओव्हलच्या मैदानात सुरु आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय फलंदाजानी दुसऱ्या डावात केलेल्या कामगिरीचं कौतुक होत असून सलामीवीरांनी केलेल्या संयमी फलंदाजीमुळे भारत सामन्यात मजबूत स्थितीत आहे. पण भारताचा सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) याला मात्र आयसीसीच्या (ICC) कारवाईला सामोरं जावं लागलं आहे. बाद झाल्यानंतर पंचाच्या निर्णयावर असहमती दर्शवत चूकीची वागणूक केल्याबद्दल राहुलवर कारवाई करण्यात आली आहे.

चौथ्या कसोटीतील दुसऱ्या डावात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल यांनी उत्तम सुरुवात करुन दिली. पण राहुल 46 धावांवर असताना त्याला अर्धशतकासाठी अवघ्या चार धावांची गरज होती. त्याचवेळी जेम्स अँडरसनच्या चेंडूवर राहुलच्या बॅटला बॉल लागून यष्टीरक्षकाच्या हातात गेला. त्यावेळी प्रथम नाबाद दिल्यानंतर इंग्लंडने रिह्यूय घेताच पंचाकडून बाद देण्यात आलं. त्यावेळी पंचाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत राहुलने असहमती दर्शवली होती. त्यामुळे आय़सीसीच्या नियमांनुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली असून त्याची 15 टक्के मॅच फी कापण्यात येणार आहे.

चौथ्या कसोटीत आतापर्यंत..

इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताचा पहिला डाव अवघ्या 191 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावांपर्यंत मजल मारत 99 धावांची आघाडी मिळवली होती. मात्र पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात चांगलीच मुसंडी मारली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (127) शतकी आणि चेतेश्वर पुजाराच्या (61) अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने तिसऱ्या दिवसअखेर 3 बाद 270 धावांपर्यंत मजल मारली आहे. अंधुक प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा उर्वरित 40 मिनिटांचा खेळ रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला आहे. तत्पूर्वी भारताने 270 धावांपर्यंत मजल मारल्यामुळे भारताला 171 धावांची आघाडी घेतली आहे.

इतर बातम्या

मॅचनंतर दादा ही कामं करायला सांगायचा, केबीसीच्या सेटवर सेहवाग-गांगुलीचा कलगीतुरा, बिग बी बघतच राहिले!

IND vs ENG : रोहितचं धडाकेबाज शतक, पुजाराचं अर्धशतक, भारताची इंग्लंडवर 171 धावांची आघाडी

(KL Rahul fined for showing dissent towards Umpire at The Oval test third day)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.