AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Retirement : इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाला आणखी एक धक्का, दिग्गजाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

Indian Cricket Team Retirement News : भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या बड्या खेळाडूने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. स्टार खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलाय.

Retirement : इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाला आणखी एक धक्का, दिग्गजाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
BcciImage Credit source: PTI
| Updated on: Jun 06, 2025 | 3:34 PM
Share

कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज खेळाडूंनी इंग्लंड दौऱ्याआधी कसोटी क्रिकेटला अलविदा करत टीम इंडियाच्या चाहत्यांना झटका दिला. त्यानंतर आता टीम इंडियाला आणखी एक मोठा झटका लागला आहे. टी 20 वर्ल्ड कप 2007 आणि 2011 वनडे वर्ल्ड कप विजेत्या संघातील दिग्गज खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या दिग्गजाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. अनुभवी फिरकीपटू पीयूष चावला याने आंतरराष्ट्रीय क्रिकटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. पीयूषने टीम इंडियाचं 3 कसोटी, 7 टी 20i आणि 25 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं.

पीयूष चावलाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

पीयूषने टीम इंडियासाठी 3 कसोटी सामन्यांमध्ये 7 विकेट्स घेतल्या. वनडे क्रिकेटमधील 25 मॅचमध्ये 32 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर 7 टी 20i सामन्यांमध्ये 4 विकेट्स मिळवल्या. पीयूषला इतर खेळाडूंच्या तुलनेत फार संधी मिळाली नाही. पीयूष गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियापासून दूर होता. पीयूषने टीम इंडियासाठी डिसेंबर 2012 साली शेवटचा सामना खेळला होता.

आयपीएल कारकीर्द

पीयूष चावलाने आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व केलं. पीयूषने आयपीएलमधील 192 सामन्यांमध्ये एकूण 192 विकेट्स घेतल्या. पीयूषची 17 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. तसेच पीयूषने 92 डावांमध्ये 624 धावा केल्या. पीयूषने या दरम्यान 56 चौकार आणि 20 षटकार लगावले. केकेआरने 2014 साली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. पीयूष त्या विजयी संघाचा भाग होता. पीयूषने त्या अंतिम सामन्यात विजयी फटका मारुन केकेआरला ट्रॉफी जिंकून दिली होती.

पीयूषने मुंबईसाठी केलेली कामगिरी

पीयूष चावलाची सोशल मीडिया पोस्ट

“दोन दशकांहून अधिक काळ मैदानावर घालवल्यानंतर आता या सुंदर खेळाला निरोप देण्याची वेळ आली आहे. सर्वोच्च स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यापासून ते 2007 टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 वनडे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमचा भाग असण्यापर्यंत, या अविश्वसनीय प्रवासातील प्रत्येक क्षण एका आशीर्वादापेक्षा कमी नव्हता. या आठवणी माझ्या हृदयात नेहमीच राहतील. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या आयपीएल संघांचे – पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स – मी मनापासून आभार मानतो”, असं म्हणत पीयुषने त्याच्या अविस्मरणीय आठवणींना उजाळा दिला आणि आयपीएल फ्रँचायजींचे जाहीर आभारही मानले.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.