AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वनडे वर्ल्डकपपासून चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत इतका झाला बदल, टीम इंडियातून या खेळाडूंना बाहेरचा रस्ता

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी खेळाडूंची घोषणा अखेर करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून खलबतं सुरु होती. 12 जानेवारी शेवटची तारीख असताना आयसीसीकडून अतिरिक्त वेळ मागून घेतला होता. अखेर टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेपासून संघात काय बदल झाला ते जाणून घ्या.

वनडे वर्ल्डकपपासून चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत इतका झाला बदल, टीम इंडियातून या खेळाडूंना बाहेरचा रस्ता
| Updated on: Jan 18, 2025 | 3:24 PM
Share

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने चांगली कामगिरी केली होती. भारताने अंतिम फेरीपर्यंत एकही सामना न गमवता धडक मारली होती. पण भारताच्या पदरी अंतिम फेरीत निराशा पडली. त्यानंतर टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत चांगली कामगिरी केली. आता पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतरचा काळ टीम इंडियासाठी काही चांगला गेला नाही. गेल्या काही दिवसात वनडे आणि कसोटी मालिकेत टीम इंडियाची पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. टीम इंडियात काही व्यवस्थित नसल्याची चर्चाही सुरु झाली आहे. त्यात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया जाहीर करताना दिरंगाई झाल्याचं पाहून चर्चांना उधाण आलं. पण अखेर निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी संघ जाहीर केला. यात संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदाची धुरा शुबमन गिलच्या खांद्यावर आहे. वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी संघात चार महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले आहेत. यात आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे त्याचा नावाचा विचार झाला नाही.

इशान किशन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दक्षिण अफ्रिका दौरा अर्धवट सोडल्यानंतर त्याला टीम इंडियात स्थान मिळालेलं नाही. त्याचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही विचार झालेला नाही. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुर यालाही वगळण्यात आलं आहे. टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यालाही संघात स्थान मिळालेलं नाही. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत त्याची कामगिरी निराशाजनक होती. त्यामुळे त्याला संघात स्थान मिळालेलं नाही. या चौघांऐवजी संघात ऋषभ पंत, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वील आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी मिळाली आहे. दरम्यान, इंग्लंड मालिकेसाठी बुमराहऐवजी हार्षित राणाला संधी देण्यात आली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (फीटनेस), मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग,यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.

वनडे वर्ल्डकप 2023 भारताचा संघ असा होता : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि शार्दुल ठाकुर.

Follow Us
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.