AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझ्यासोबत पहलगाम सारखं…’ पाकिस्तानी क्रिकेटपटूकडून आपल्याच देशाची पोलखोल

काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. हिंदू पर्यटकांना टार्गेट करून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. त्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. दुसरीकडे, पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याबाबत आपल्याच सरकारची पोलखोल करत आहे.

'माझ्यासोबत पहलगाम सारखं...' पाकिस्तानी क्रिकेटपटूकडून आपल्याच देशाची पोलखोल
दानिश कनेरियाImage Credit source: TV9 Network
| Updated on: Apr 24, 2025 | 10:27 PM
Share

काश्मीरच्या पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. पर्यटनासाठी आलेल्या हिंदू नागरिकांना लक्ष्य करून गोळ्या झाडल्या. त्यामुळे संपूर्ण देशात पाकिस्तानविरुद्ध राग आहे. तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाकिस्तानला लवकरच धडा शिकवू असा इशारा दिला आहे. असं असताना पाकिस्तानातूनही असाच आवाज उचलला जात आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने आपल्याच देशाची पोलखोल केली आहे. क्रिकेटपटू दानिश कनेरियाने सांगितलं की, हिंदू असल्याने पाकिस्तानात वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया याने वारंवार या घटनेचा निषेध केला आहे. इतकंच काय तर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. पाकिस्तानचा या हल्ल्यात कोणताही हस्तक्षेप नव्हता तर याप्रकरणी निषेध का नोंदवला नाही?

दानिश कनेरियाने सोशल मीडियावर एका पाकिस्तान युजर्सचं तोंड बंद करत लिहिलं की, हिंदू असल्या कारणाने असाच निशाणा साधला गेला, जसं की पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हिंदू असल्याने मारलं. दानिशने एक्स सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, ‘मी पाकिस्तान किंवा लोकांविरुद्ध बोलत नाही. मी पण एकदा अभिमानाने पाकिस्तानची जर्सी परिधान केली होती. मी सुद्धा क्रिकेटच्या मैदानात घाम गाळला आहे. पण माझा शेवटही पहलगाम हल्ल्यातील पीडितांसारखाच झाला. फक्त हिंदू असल्याने टार्गेट केलं गेलं.’

22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटनाचा आनंद लुटणाऱ्या नागरिकांना दहशतवाद्यांनी टार्गेट केलं. गोळ्या झाडण्यापूर्वी प्रत्येकाला त्याचा धर्म विचारला. पीडित नागरिकांनी याचा खुलासा मीडियासमोर केला आहे. हिंदू असल्याचं कळताच निर्घृणपणे बायका मुलांसमोर हत्या केली. या हल्ल्यात 28 निष्पाप नागरिकांचा बळी गेला.

Follow Us
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात