AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG | कसोटी दरम्यान पंतप्रधान मोदींनी टीम इंडियातील ‘या’ खेळाडूला दिल्या खास शुभेच्छा

IND vs ENG | पंतप्रधान नरेंद्र मोदींच क्रीडा क्षेत्रावरही बारीक लक्ष असतं. क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या खेळाडूंच ते नेहमीच कौतुक करतात. त्यांना प्रोत्साहन देतात. परदेशात एखाद्या खेळाडूने देशाच नाव उंचावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लगेच त्या खेळाडूशी फोनवरुन संपर्क साधतात.

IND vs ENG | कसोटी दरम्यान पंतप्रधान मोदींनी टीम इंडियातील 'या' खेळाडूला दिल्या खास शुभेच्छा
Narendra Modi
| Updated on: Feb 17, 2024 | 8:30 AM
Share

IND vs ENG | देशाचा कारभार चालवत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच क्रीडा क्षेत्रावरही बारीक लक्ष असतं. क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या खेळाडूंच ते नेहमीच कौतुक करतात. त्यांना प्रोत्साहन देतात. परदेशात एखाद्या खेळाडूने देशाच नाव उंचावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लगेच त्या खेळाडूशी फोनवरुन संपर्क साधतात. त्याच कौतुक करतात. ऑलिम्पिकमध्ये हे अनेकदा दिसून आलय. मागच्यावर्षी वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा फायनलमध्ये पराभव झाला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंना धीर दिला होता. आता त्यांनी टीम इंडियातील एका खेळाडूच कौतुक केलय. महत्त्वाच म्हणजे हा खेळाडू सुद्धा कौतुकाला तितकाच पात्र आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एक मोठा टप्पा गाठलाय. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्याच्या कामगिरीची दखल घेतलीय.

भारत-इंग्लंडमध्ये तिसरा कसोटी सामना सुरु असताना राजकोटमध्ये इतिहास रचला गेला. सीनियर स्पिनर रविचंद्रन अश्विनने 500 विकेट पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. रविचंद्रन अश्विनने करीअरमध्ये हा जो टप्पा गाठलाय, त्यावर समाधान व्यक्त केलय. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 619 विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. या राष्ट्रीय रेकॉर्डचा पाठलाग करण्यात अश्विनला अजिबात रस नाहीय. अश्विनने इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्यादिवशी 500 विकेट पूर्ण केले. दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्याने मीडियाशी संवाद साधला.

पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा संदेशात काय म्हटलय?

कुंबळेच्या रेकॉर्डबद्दल अश्विनला विचारलं तेव्हा तो म्हणाला की, “याच सरळ उत्तर नाहीय. हा रेकॉर्ड 120 विकेट दूर आहे. मला प्रत्येक दिवस जगायच आहे. मी 37 वर्षांचा आहे. पुढे काय होणार हे मला माहित नाही” “करीअरमध्ये 500 विकेट घेऊन, हा जो असामान्य महत्त्वाचा टप्पा गाठलाय, त्याबद्दल अश्विन तुला शुभेच्छा. अश्विनचा हा जो प्रवास आहे, कर्तुत्व आहे, त्यातून त्याचं कौशल्य आणि चिकाटीची साक्ष मिळते. माझ्या मनापासून अश्विनला शुभेच्छा, त्याने करीअरमध्ये अजून उंची गाठावी” असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.