AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: लज्जास्पद पराभवानंतर राहुल द्रविड यांचं वादग्रस्त वक्तव्य

IND vs ENG: राहुल द्रविड यांनी BCCI वर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह.

IND vs ENG: लज्जास्पद पराभवानंतर राहुल द्रविड यांचं वादग्रस्त वक्तव्य
rahul-DravidImage Credit source: AFP
| Updated on: Nov 10, 2022 | 6:13 PM
Share

एडिलेड: T20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव झाला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 169 धावांच लक्ष्य दिलं होतं. इंग्लंडने एकही विकेट न गमावता हे टार्गेट पूर्ण केलं. 4 ओव्हरआधीच इंग्लंडला विजय मिळवून दिला. इतक्या मोठ्या पराभवानंतर टीम इंडियाच नाही, कोट्यवधी क्रिकेट चाहते निराश झालेत.

या पराभवानंतर टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांनी बीसीसीआयवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं विधान केलय. बीसीसीआयच्या विचारसरणीवर प्रश्न निर्माण केलाय.

राहुल द्रविड काय म्हणाले?

“परदेशी लीगमध्ये खेळल्याने आमच्या खेळाडूंचा फायदा होईल. हे बीसीसीआयवर आहे. निर्णय त्यांना घ्यायचा आहे” असं विधान हेड कोच द्रविड यांनी केलं. बीसीसीआय आपल्या खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळू देत नाही. भारतीय क्रिकेटशी संबंधित कुठलाही खेळाडू परदेशी लीगमध्ये खेळू शकत नाही. दुसऱ्याबाजूला इंग्लंडचे खेळाडू जगभरातील लीग क्रिकेटमध्ये खेळत असतात.

खेळाडूंना काय फायदा होतो?

भारताविरुद्ध कमालीची फलंदाजी करणारे जोस बटलर आणि एलेक्स हेल्स जगभरातील लीग्समध्ये खेळत असतात. हेल्स आयपीएलशिवाय कॅरेबियन प्रीमियर लीग, पाकिस्तान सुपर लीग आणि ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीगमध्येही खेळतो. बिग बॅश लीगमध्ये खेळण्याचा फायदा एलेक्स हेल्सला झाला.

या खेळाडूने टी 20 वर्ल्ड कपमध्ये कमालीच प्रदर्शन केलय. विदेशी लीगमध्ये खेळल्याने तुम्हाला त्या देशाच्या कंडीशन्स आणि खेळपट्टीचा अनुभव मिळतो. आयसीसी टुर्नामेंटसमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होतो.

10 विकेटने झालेल्या पराभवावर हेड कोच काय म्हणाले?

टीम इंडियाचा 10 विकेटने पराभव झाला. राहुल द्रविड या पराभवामुळे हैराण दिसले नाहीत. अशा गोष्टी क्रिकेटमध्ये घड़त असतात, असं ते म्हणाले. या पराभवामुळे मी निराश आहे, असही त्यांनी सांगितलं. टीम इंडिया एकमेव टीम आहे, सलग दोन टी 20 वर्ल्ड कपमध्ये त्यांचा 10 विकेटने पराभव झालाय. पाकिस्तानने 2021 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा 10 विकेटने पराभव केला होता.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.