AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final : विराट, पुजारा इतकी बेक्कार फलंदाजी का करत आहेत?; राहुल द्रविड यांनी सांगितलं सर्वात मोठं कारण

भारत पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पराभूत झाला आहे. भारताची टॉप ऑर्डर सपशेल फेल गेल्याने भारताचा पराभव झाला आहे. त्यावर राहुल द्रविड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

WTC Final : विराट, पुजारा इतकी बेक्कार फलंदाजी का करत आहेत?; राहुल द्रविड यांनी सांगितलं सर्वात मोठं कारण
Rahul DravidImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 12, 2023 | 6:57 AM
Share

नवी दिल्ली : टीम इंडिया पुन्हा एकदा आयसीसीच्या टुर्नामेंटमध्ये पराभूत झाली आहे. गेल्या दहा वर्षापासून हीच हाराकिरी सुरू आहे. 2013मध्येही भारत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू शकला नाही. त्यानंतर आजपर्यंत भारत आयसीसी टुर्नामेंटमध्ये चषक जिंकण्याची कामगिरी करू शकला नाही. कालही भारताने हाततला सामना गमावला. त्याला कारणीभूत भारताचे चार प्रमुख फलंदाज आहे. त्यातही चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली सपशेल अपयशी ठरल्याने अपयशाचं खापर त्यांच्यावर फोडलं जात आहे. टीम इंडियाचे प्रमुख कोच राहुल द्रविड यांनी या मुद्द्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. पुजारा आणि विराटसह टॉप चार फलंदाजांनी इतकी वाईट फलंदाजी का केली? यावरही राहुल यांनी उत्तर दिलं आहे.

टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरचे फलंदाज अत्यंत जबरदस्त आहेत. त्यांच्यामुळेच भारताने ऑस्ट्रेलियात दोन वेळा कसोटी मालिका जिंकली आहे. मात्र, काही सीरिजमध्ये बॅटिंग कंडिशन्स चांगली नव्हती, असं सांगतानाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकण्यासाठी प्रत्येक देश अत्यंत कठिण पिच तयार करत आहे, असं राहुल द्रविड यांनी सांगितलं.

सर्वांचाच सरासरी रेट कमी

केवळ भारतच नाही तर इतर संघातील फलंदाजांचाही सरासरी रेट कमी झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकण्यासाठी कठिण पिच तयार केली जात आहे. प्रत्येक ठिकाणी टेस्ट मॅच लवकर संपत आहे, असंही राहुल द्रविड यांनी सांगितलं. राहुल द्रविड यांचं हे विधान आणि कारण अजब आहे. कारण ज्या पिचवर पुजारा आणि विराटसारखे लोक फेल होत आहे, तर दुसरीकडे ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा धावांचा पाऊस पाडत आहेत. त्याच पिचवर स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन आणि जो रूट सुद्धा दमदार कामगिरी करत आहेत. अशावेळी राहुल द्रविड पिचला दोष देत असल्याने सर्वांना आश्चर्य वाटत आहे.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

तीन वर्षापासून खराब कामगिरी

गेल्या तीन वर्षापासून विराट आणि पुजाराची खराब कामगिरी राहिली आहे. टेस्ट फॉर्मेटमध्ये दोघांची सरासरी 30 पेक्षा कमी आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये दोन्ही खेळाडू 17-17 सामने खेळले. दोघांची सरासरी 32 इतकी आहे. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी एक एक शतक लगावले आहे. याच चॅम्पियनशीपमध्ये जो रूटने 53पेक्षा अधिक सरासरीने 1915 धावा केल्या आहेत. उस्मान ख्वाजाने 64 हून अधिक सरासरीने 1621 धावा केल्या आहेत. तर लाबुशेन, स्मिथ आणि बाबर आजम यांची सरासरी 50 पेक्षा अधिक राहिली आहे.

Follow Us
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...