AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC: राहुल द्रविड, रोहित, विराटच्या विमानातल्या एका अनपेक्षित कृतीने जिंकली सगळ्यांची मन

T20 WC: टीममधल्या सिनियर्सनी हे पाऊल उचललं त्यामागे काय कारण आहे?

T20 WC: राहुल द्रविड, रोहित, विराटच्या विमानातल्या एका अनपेक्षित कृतीने जिंकली सगळ्यांची मन
रोहित शर्मा आणि विराट कोहलीImage Credit source: social
| Updated on: Nov 08, 2022 | 1:22 PM
Share

एडिलेड: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची चांगली कामगिरी सुरु आहे. यात बॉलर्सच योगदान महत्त्वपूर्ण आहे. अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शमी हे भारताचे चारही वेगवान गोलंदाज मोक्याच्या क्षणी टीम इंडियाला विकेट मिळवून देतायत. वेगवान गोलंदाज तेव्हाच जबरदस्त गोलंदाजी करतात, जेव्हा त्यांना आराम मिळतो, ते फिट असतात.

आता दुखापत अजिबात परवडणार नाही

आपल्या फास्ट बॉलर्सची काळजी घेणं, कुठल्याही टीमसाठी महत्त्वाच असतं. कारण फास्ट बॉलर्सना दुखापतीचा धोका असतो. टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. या स्टेजवर दुखापत अजिबात परवडणार नाही.

टीममधले सिनियर्स विशेष काळजी घेतायत

वर्ल्ड कपचे सामने एकापाठोपाठ एक सुरु आहेत. तीन-चार दिवसाच्या गॅपने सामना होतोय. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात सतत एका शहरातून दुसऱ्या शहरात हवाई प्रवास करावा लागतोय. अशावेळी खेळाडूंना प्रवासात दगदग होणं स्वाभाविक आहे. खासकरुन गोलंदाजांना जास्त त्रास होऊ नये, म्हणून टीममधले सिनियर्स विशेष काळजी घेतायत.

आपली सीट का दिली?

एडिलेडमध्ये होणाऱ्या सेमीफायनलपूर्वी हेड कोच राहुल द्रविड, रोहित शर्मा आणि विराट कोहलीने त्यांची बिझनेस क्लासची सीट मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्याला दिली. बिझनेस क्लासच्या सीटमध्ये पाय पसरुन आरामदायक प्रवासाची सुविधा असते. यामुळे जास्त आराम मिळतो. म्हणून टीममधल्या सिनियर्सची आपली सीट गोलंदाजांना दिली. जेणेकरुन त्यांना जास्त आराम मिळेल. कारण पुढच्या मॅचमध्ये गोलंदाजांची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे.

टीम इंडिया सेमीफायनलसाठी एडिलेडमध्ये दाखल झालीय. गुरुवारी इंग्लंड विरुद्ध सेमीफायनलचा सामना होणार आहे. रविवारी टीम इंडियाने ग्रुप स्टेजमधील झिम्बाब्वे विरुद्धचा शेवटचा सामना जिंकला.

प्रत्येक टीमला बिझनेस क्लासच्या किती तिकीट्स मिळतात?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलच्या नियमानुसार, प्रत्येक टीमला बिझनेस क्लासच्या चार तिकीटस मिळतात. बहुतांश टीम या सीटस कोच, कॅप्टन, उपकर्णधार आणि मॅनेजरला देतात. भारतीय टीमला दस तिसऱ्या, चौथ्या दिवशी प्रवास करावा लागतोय. वेगवान गोलंदाजांना प्रवासात चांगली सीट मिळाली पाहिजे, हे टीम मॅनेजमेंटने आधीच ठरवलय. त्यामुळे या सीट्स गोलंदाजांना देण्यात आल्या.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?