AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ODI World Cup 2023 | IND vs PAK वर्ल्ड कपमधील सामन्यावर मनसेने जाहीर केली भूमिका

ODI World Cup 2023 | दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांसाठी हा सामना कुठल्या युद्धापेक्षा कमी नसतो. दोन्ही बाजूंना विजयच हवा अशी भूमिका असते. खेळ म्हटल्यावर कुठली एक टीम हरते, त्याचे पडसाद त्या-त्या देशात उमटतात.

ODI World Cup 2023 | IND vs PAK वर्ल्ड कपमधील सामन्यावर मनसेने जाहीर केली भूमिका
ind vs pak ODI World Cup 2023 match mns chief Raj Thackeray objectsImage Credit source: PTI
| Updated on: Jun 29, 2023 | 1:47 PM
Share

मुंबई : यंदाची वनडे वर्ल्ड कप स्पर्धा भारतात होणार आहे. 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होईल. वर्ल्ड कपचा पहिला आणि शेवटचा फायनल सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. वर्ल्ड कपच शेड्युल जाहीर झाल्याने सर्व क्रिकेट चाहते आनंदात आहेत. सर्वांना उत्सुक्ता आहे, ती भारत-पाकिस्तान सामन्याची. 15 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. भारत-पाकिस्तानचा क्रिकेट सामना हा खेळाचा भाग आहे. पण त्यात बरेच अर्थ, भावना दडलेल्या आहेत.

दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांसाठी हा सामना कुठल्या युद्धापेक्षा कमी नसतो. दोन्ही बाजूंना विजयच हवा अशी भूमिका असते. खेळ म्हटल्यावर कुठली एक टीम हरते, त्याचे पडसाद त्या-त्या देशात उमटतात.

मनसेने काय भूमिका घेतली?

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना हा चाहत्यांसाठी खेळाचा भाग आहे. पण या सामन्याच्या निमित्ताने राजकीय पक्ष सुद्धा भूमिका ठरवत असतात. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला विरोध केला आहे. “जे लोक आपल्या सैनिकांवर हल्ला करतात, त्यांचे प्राण घेतात. हनी ट्रॅपमध्ये आपल्या अधिकाऱ्यांना अडकवतात. अशा देशाबरोबर आपण खेळायच का?” असा सवाल मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.

संदीप देशपांडे काय म्हणाले?

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याची भारताला जी झळ सोसावी लागली, तो मुद्दा संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. “भारतात झालेल्या सर्व दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तान आहे. आपण अशा देशाच स्वागत करायच का? हा देशाचा विषय आहे, राजकारणाचा नाही” असं संदीप देशपांडे म्हणाले.

आपण हे सहन करायच का?

“असे सामने जेव्हा भारतात होतात, तेव्हा पाकिस्तानी नागरिक आपला ध्वज घेऊन येतात. आपण हे सहन करायच का? संपूर्ण देशात या विषयावर चर्चा झाली पाहिजे” असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं. “मी, जे काही बोललो, त्या माझ्या भावना आहेत, पक्षाची भूमिका राज ठाकरे जाहीर करतील” असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं. संदीप देशपांडेंनी काय टि्वट केलय?

संदीप देशपांडे यांनी या संदर्भात एक टि्वट केलय. “भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्तानात व्हावा हे अजिबात न पटणार आहे. हे मा.बाळासाहेबांना कदापिही पटलं नसत आणि तो सामना नरेंद्र मोदी स्टेडियम व्हावं हे तर पटूच शकत नाही यावर भा ज प आणि शिवसेना यांची काय भूमिका आहे उ बा ठा यांना विचारत नाही आहे कारण त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे” असं संदीप देशपांडे यांनी टि्वटमध्ये म्हटलय.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.