AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC World Cup 2023 announcement : IND vs PAK वर्ल्ड कप सामन्याची तारीख जाहीर

ICC Men's Cricket World Cup 2023 schedule announcement : आज वनडे वर्ल्ड कपच वेळापत्रक जाहीर झालं. यंदा क्रिकेट वर्ल्ड कप भारतात होणार आहे. सर्वांना प्रतिक्षा असेत, ती भारत-पाकिस्तान लढतीची. ती तारीख जाहीर झाली आहे.

ICC World Cup 2023 announcement : IND vs PAK वर्ल्ड कप  सामन्याची तारीख जाहीर
ind vs pak world cup 2023
| Updated on: Jun 27, 2023 | 12:41 PM
Share

मुंबई : यंदा क्रिकेट वर्ल्ड कप भारतात होणार आहे. वर्ल्ड कप 2023 च वेळापत्रक जाहीर झालं आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 19 नोव्हेंबरला वर्ल्ड कपची फायनल आहे. आज वर्ल्ड कपच वेळापत्रक जाहीर होत असताना सर्वांच लक्ष भारत-पाकिस्तान सामन्याकडे आहे. वनडे किंवा T20 मध्ये भारत-पाकिस्तान सामन्याशिवाय कुठलाही वर्ल्ड कप पूर्ण होत नाही. भारत-पाकिस्तानच नाही, तर जगभरातील कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांच वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याकडे लक्ष असतं.

भारत-पाकिस्तान सामना क्रिकेटच्या मैदानावर खेळला जात असला,. तरी तो कुठल्या युद्धापेक्षा कमी नसतो. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने आयसीसी आणि वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणाऱ्या देशांना वर्ल्ड कपच ड्राफ्ट शेड्यूल पाठवलं होतं.

भारत-पाकिस्तान सामना कधी?

आज मुंबईत एका हॉटेलमध्ये वर्ल्ड कपच शेड्युल जाहीर झालं. ड्राफ्ट शेड्युलमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यासाठी 15 ऑक्टोबरची तारीख ठरली होती. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही मॅच होईल. आज जाहीर झालेल्या ओरिजनल शेड्युलमध्ये यात कोणताही बदल झालेला नाही. भारत-पाकिस्तान सामना 15 ऑक्टोबरलाच ठरलेल्या वेळेला, त्याच स्टेडियममध्ये होईल.

वर्ल्ड कपमध्ये दोन्ही टीम्सचा रेकॉर्ड काय?

इतर कुठल्याही सामन्यांपेक्षा वर्ल्ड कपमध्ये होणारा भारत-पाकिस्तान सामना खास असतो. मागच्या काही वर्षातील तणावपूर्ण संबंधांमुळे भारत-पाकिस्तानचे संघ सध्या फक्त आयसीसी टुर्नामेंटमध्ये परस्पराविरुद्ध खेळतात. क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये फक्त एकदाच पाकिस्तानच्या टीमने टीम इंडियाला हरवलय. वनडे वर्ल्ड कपमध्ये अजूनपर्यंत तरी पाकिस्तानी टीम भारताला हरवू शकलेली नाही. फक्त एकदाच T20 वर्ल्ड कपमध्ये बाबर आजमच्या टीमने भारताला पराभूत केलय.

त्यावेळी सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला हरवलेलं

वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया 1992 पासून अजिंक्य आहे. 1992, 1996, 1999, 2003 आणि 2011 या पाचही वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत केलय. 2007 मध्ये दोन्ही टीम्सच साखळी फेरीत आव्हान संपुष्टात आलं होतं. त्यामुळे सामना झाला नाही. पण 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केलं होतं. विराटचे ते दोन सिक्स आजही आठवतात

2021 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने पहिल्यांदा टीम इंडियाला पराभूत केलं होतं. मागच्यावर्षी ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप झाला. त्यावेळी टीम इंडियाने पाकिस्तानवर दिमाखदार विजय मिळवून मागच्या पराभवाचा वचपा काढला होता. भारताच्या विजयात विराट कोहलीने महत्वाची भूमिका बजावली होती. विराटने हॅरिस रौफला मारलेले दोन सिक्स आजही क्रिकेट रसिकांच्या चांगले लक्षात आहेत.

Follow Us
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?