AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजआधी रोहितसह तिघे खेळणारे 1 सामना, टीम जाहीर, आयुषला संधी

Rohit Sharma : रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यर हे त्रिकुट इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजआधी 1 सामना खेळणार आहेत. निवड समितीने या सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजआधी रोहितसह तिघे खेळणारे 1 सामना, टीम जाहीर, आयुषला संधी
rohit sharma and yashasvi jaiswalImage Credit source: AFP
| Updated on: Jan 20, 2025 | 6:40 PM
Share

टीम इंडिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी इंग्लंड विरुद्ध मायदेशात टी 20I आणि वनडे सीरिज खेळणार आहे.टी 20I मालिकेला 22 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तर टी 20I मालिकेनंतर वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने टीम इंडियासाठी इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका फार निर्णायक आहे. त्याआधी टीम इंडियाच्या वनडे सीरिजमधील 3 खेळाडू हे एक सामना खेळणार आहेत. त्या एकमेव सामन्यासाठी निवड समितीने 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

विजय हजारे ट्रॉफीनंतर आता रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या टप्प्याला 23 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. मुंबई जम्मू काश्मिरविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी मुंबई क्रिकेट निवड समितीने संघ जाहीर केला आहे. त्यानुसार अजिंक्य रहाणेला पुन्हा एकदा कर्णधारपद देण्यात आलं आहे. रहाणे मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तसेच इंग्लंडविरुद्ध वनडे सीरिजमध्ये असलेल्या रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि यशस्वी जयस्वाल या तिघांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. रोहित आणि यशस्वी या दोघांचं देशांतर्गत क्रिकेटमध्ये यासह पुनरागमन झालं आहे.

तसेच मुंबई संघात शिवम दुबे आणि शार्दूल ठाकुर या कॅप्ड खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. सोबतच वसईकर आयुष म्हात्रे व्यतिरिक्त सिद्धेश लाड, हार्दिक तामोरे, तनुष कोटीयन, शम्स मुलानी या स्टार खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे.

सामना कुठे?

दरम्यान उभयसंघातील हा सामना 23 ते 26 जानेवारी दरम्यान मुंबईतील बीकेसी येथील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या शरद पवार क्रिकेट अकादमीत खेळवण्यात येणार आहे.

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी मेजवानी

जम्मू काश्मिर विरूद्धच्या सामन्यासाठी मुंबई टीम : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर,सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर),आकाश आनंद (विकेटकीपर), तनुष कोटीयन, शम्स मुलानी, हिमांशु सिंग, शार्दूल ठाकुर, मोहित अवस्थी, सिलवेस्टर डीसोझा, रॉयस्टर डायस आणि कर्श कोठारी.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.