AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : कसोटीतील पराभवानंतर रवी शास्त्री या खेळाडूवर भडकले, ‘बारकं पोरगं नाही’ म्हणत रणजी खेळण्याचा सल्ला

Ravi Shastri on ind vs sa first test match : टीम इंडियाचा पहिल्या कसोटी सामन्यात आफ्रिकेविरूद्ध झालेला पराभव सर्वांच्या जिव्हारी लागला आहे. आफ्रिकेने डावाने विजय मिळवल्याने टीम इंडियाचा मोठा पराभव झाला आहे. या पराभवानंतर रवी शास्त्री यांनी एका खेळाडूल झापलं आहे.

IND vs SA : कसोटीतील पराभवानंतर रवी शास्त्री या खेळाडूवर भडकले, 'बारकं पोरगं नाही' म्हणत रणजी खेळण्याचा सल्ला
Ravi Shatri on Shardul Thackurfirst test match
| Updated on: Dec 29, 2023 | 4:55 PM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा एक डाव आणि 32 धावांनी मोठा पराभव झाला. आफ्रिकेला त्यांच्याच भूमिकेत पराभूत करण्याचं स्वप्न आणखी एकदा अधूर राहिलं आहे. या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. त्यासोबतच गोलंदाजांनीही म्हणावी अशी धार दाखवली नाही, याचा परिणाम असा झाला की टीम इंडियाचा फक्त पराभवच नाही झाला तर डावाने आफ्रिकेने विजय मिळवला. या पराभवानंतर टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री  एका खेळाडूवर चांगलेच भडकले आहेत.

काय म्हणाले रवी शास्त्री?

टीम इंडियाच्या गोलंदाजीमध्ये अनुभवाची कमतरता दिसून आली. सुरूवीताच्या स्पेलमध्ये मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी चांगला दबाव निर्माण केला होता. मात्र तिसऱ्या गोलंदाजाची कमी पडली. शार्दूल ठाकूर हा बारिक पोरगा नाही तो चौथा फास्टर आहे. परदेशात खेळताना तुमच्या संघात तिसरा फास्टर असणं गरजेचं आहे कारण त्यामुळे मोठा फरक पडत असल्याचं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.

रवी शास्त्री यांच्यासोबत चर्चा करत असताना मार्क निकोल्सने अर्शदीप सिंह याचं नाव घेतलं. यावर बोलताना, अर्शदीपने जोहान्सबर्गमध्ये पाच विकेट त्यानंतर पार्लमध्ये चार विकेट घेतल्या होत्या. त्याच्याकडे डाव्या हाताने चेंडू टाकण्याचं चांगलं कौशल्य आहे मात्र कसोटी क्रिकेटसाठी तो तयार आहे का? असा सवाल शास्त्री यांनी केला. अर्शदीप याने घरगुती क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त रणजी क्रिकेट आणि प्रथम श्रेणीचे सामने खेळायला हवेत असा सल्लाही शास्त्री यांनी दिला.

दरम्यान, शेवटच्या म्हणजेच दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये मोहम्मद शमी याच्या जागी बदली खेळाडू म्हणून आवेश खान याची निवड करण्यात आली आहे. आवेश खान याने वन डे सामन्यांमध्ये केलेल्या दमदार कामगिरीमुळे त्याची निवड करण्यात आली असावी. आवेश खान याला दुसऱ्या कसोटीमध्ये संधी मिळते की मुकेश कुमार याची निवड केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध्द कृष्णा, केएस भरत (WK), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.