AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravindra Jadeja – त्याच्याजागी जाडेजाला बनवलं कॅप्टन, 3 मॅचमध्ये 17 विकेट घेणारा बॉलर नाही खेळणार

Ravindra Jadeja - आशिया कप स्पर्धे दरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. पुढचे काही महिने त्याला सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार होती. त्यामुळे तो टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकला नाही.

Ravindra Jadeja - त्याच्याजागी जाडेजाला बनवलं कॅप्टन, 3 मॅचमध्ये 17 विकेट घेणारा बॉलर नाही खेळणार
Ravindra jadeja Image Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Jan 23, 2023 | 12:14 PM
Share

अहमदाबाद – टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा आता पूर्णपणे फिट झालाय. आशिया कप स्पर्धे दरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. पुढचे काही महिने त्याला सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार होती. त्यामुळे तो टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकला नाही. रवींद्र जाडेजा आता पूर्णपणे फिट झालाय. जाडेजा पुनरागमनासाठी तयार आहे. मंगळवारपासून सुरु होणाऱ्या रणजी सामन्यात रवींद्र जाडेजा खेळणार आहे. सौराष्ट्रासाठी तो रणजी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तामिळनाडू विरुद्ध हा सामना होईल. रवींद्र जाडेजाला या सामन्यासाठी सौराष्ट्रच कॅप्टन बनवण्यात आलय.

कॅप्टन का बदलला?

जयदेव उनाडकट सौराष्ट्राचा फुलटाइम कॅप्टन आहे. पण चेन्नईमध्ये होणाऱ्या सामन्यात जाडेजा सौराष्ट्राचा कॅप्टन असेल. जाडेजाला कॅप्टन का बनवलं? जयदेवला बदलून जाडेजाला कॅप्टन का बनवलं? असा प्रश्न तुमच्या मनात असेल. याचं कारण आहे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी.

म्हणून जयदेवला दिला आराम

सौराष्ट्राचा कॅप्टन जयदेव उनाडकटला या सामन्यात आराम देण्यात आलाय़. तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. म्हणून जयदेव उनाडकटला आराम देण्यात आलय. बांग्लादेश दौऱ्यावर जयदेव उनाडटक दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळला. दुसऱ्याबाजूला रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे इतके महिने क्रिकेटच्या मैदानापासून लांब होता. मॅच प्रॅक्टिससाठी तो तामिळनाडू विरुद्ध रणजी सामन्यात खेळणार आहे. जयदेवची जागा भरुन काढणं सोपं नाही

रवींद्र जाडेजासाठी जयदेव उनाडकटची कमतरता भरुन काढणं इतकं सोपं नसेल. जयदेवने या टीमला फ्रंटवरुन लीड केलय. त्याने 3 सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळेच सौराष्ट्राची टीम ग्रुप बी मध्ये टॉपवर आहे. आता जयदेवला आराम देण्यात आलाय. रवींद्र जाडेजाला स्वत:ला सिद्ध कराव लागेल. ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या टेस्ट सीरीजआधी सूर सापडणं आवश्यक आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची टेस्ट सीरीज 9 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.