AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs LSG : कोहली आणि गंभीर यांच्याविरुद्ध कोणत्या नियमांतर्गत कारवाई? जाणून घ्या आयपीएल नियमावलीबाबत

IPL 2023 : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणाची दखल घेऊन बीसीसीआयने दोघांना दंडही ठोठावला. पण बीसीसीआय नेमकी शिक्षा कशी ठरवते? जाणून घ्या

RCB vs LSG : कोहली आणि गंभीर यांच्याविरुद्ध कोणत्या नियमांतर्गत कारवाई? जाणून घ्या आयपीएल नियमावलीबाबत
RCB vs LSG : कोहली आणि गंभीर यांच्यावर या नियमांतर्गत कारवाई, आयपीएल नियमावलीबाबत जाणून घ्या
| Updated on: May 02, 2023 | 2:57 PM
Share

मुंबई : आयपीएल स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली असताना विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद चर्चेचा ठरला आहे. सामन्यानंतर झालेली बाचाबाचीने सर्वांचं लक्ष वेधलं. आयपीएल 2023 मधील ही सर्वात मोठी घडामोड ठरली आहे. नेमकं काय झालं असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. त्याचबरोबर काही आजी माजी खेळाडूंनी खडे बोलही सुनावले आहे. असं सगळं सुरु असताना बीसीसीआयचे आयपीएलच्या नियमावलीनुसार विराट आणि गंभीर विरोधात कारवाई केली आहे. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या सामना फी मधून 100 टक्के दंड ठोठावला आहे. मग बीसीसीआय हे मोघम ठरवते की खरंच असा काही नियम आहे? जाणून घ्या

गंभीर आणि कोहलीकडून 2.21 या नियमाचं उल्लंघन

आयपीएल स्पर्धेतील सामन्यात खेळाडूंकडून गैरवर्तन होऊ नये यासाठी बीसीसीआयने नियमावली तयार केली आहे. या नियमावलीला आयपीएल कोड ऑफ कंडक्ट असं संबोधलं जातं. सामन्यात एखाद्या खेळाडूने उल्लंघन केलं तर या नियमांतर्गत कारवाई केली जाते. लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यात या नियमावलीचं उल्लंघन झाला. विराट आणि गंभीर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या घटनेची दखल बीसीसीआयने घेतली आणि नियम 2.21 नुसार कारवाई केली.

काय आहे आयपीएल नियम 2.21

आयपीएल कोड ऑफ कंडक्टमधील 2.21 हा नियम खूप महत्त्वाचा आहे. एखाद्या वादामुळे खेळाचं नाव खराब झाल्यास हा नियम लागू होतो. विराट आणि गंभीर वादामुळे असंच काहीसं झालं आहे. या नियमांतर्गत जाणीवपूर्वक डिवचणे, अश्लिल टिका करणे यांचा समावेश आहे. भर मैदानात विचित्र कृती करणे यात नमूद आहे. अर्थात विराट आणि गंभीर या दोघांनी या नियमाचं उल्लंघन केलं आणि त्या प्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.

गंभीर आणि विराटला किती दंड ठोठावला

विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हक या वादाला कारणीभूत ठरले. बीसीसीआयने या प्रकरणी तिघांना दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी दंडात्मक कारवाई म्हणून कोहलीला 100 टक्के सामना फी भरण्याचा दंड ठोठावला आहे. म्हणजेच 1.07 कोटी रुपये भरावे लागतील. तर गौतम गंभीरला 100 टक्के सामना फी म्हणजेच 25 लाख रुपये भरायचे आहेत.

नवीन उल हकला सामन्याच्या 50 टक्के रक्कम म्हणजेच 1.79 लाख रुपये दंड ठोवण्यात आला आहे. तिघांनी आपला गुन्हा मान्य केला आहे. त्यामुळे याप्रकरणी आता पुढे कोणतीच सुनावणी होणार नाही.

Follow Us
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप
शरद पवारांचं थेट पंतप्रधान मोदींना बारामतीचं निमंत्रण; चर्चांना उधाण
मोठी राजकीय घडामोड! शरद पवारांचं थेट पंतप्रधान मोदींना बारामतीचं निमंत्रण; चर्चांना उधाण
धो धो धो पावसात चक्क शाळाच... दोरीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचा बचाव
Video | धो धो धो पावसात चक्क शाळाच... दोरीच्या सहाय्याने चिमुकल्यांचा रेस्क्यु, धडकी भरवणारा व्हिडीओ समोर
PM मोदींचा व्हिडिओ हटवल्यानंतर मेटाचा यू-टर्न; मागितली माफी
मोठी बातमी! PM मोदींचा व्हिडिओ हटवल्यानंतर मेटाचा यू-टर्न; तांत्रिक चूक म्हणत मागितली माफी
शरद पवारांची राष्ट्रावादी खरंच NDA मध्ये सामिल होणार? तीन प्रतिक्रिया
शरद पवारांची राष्ट्रावादी खरंच NDA मध्ये सामिल होणार? तीन प्रतिक्रिया अन् अखेर सगळंच समोर आलं
शेतकऱ्यांना दिलासा, कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीबाबत मोठी घोषणा
Datta Bharene | शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीबाबत कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय! 10-20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय! 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांबाबत नवी अपडेट समोर, आता...
MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा
Aaditya Thackeray PC | MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा, मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं!
सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला?
Priyanka Gandhi | सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला? धर्मेंद्र प्रधानांवरून प्रियांका गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल,
MPSC Paper Case | कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल, सकाळपासूनच... हे काय घडलं?