AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma WTC Final : 5 दिवस, 5 चूका, ज्यामुळे फायनलमध्ये हरली टीम इंडिया

Rohit Sharma WTC Final : ऑस्ट्रेलियासमोर टीम इंडियाच काहीच चाललं नाही, असं का?. टीम इंडियाने या मॅचमध्ये फक्त टॉस जिंकला. त्यानंतर सर्वच सेशनमध्ये ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवलं.

Rohit Sharma WTC Final : 5 दिवस, 5 चूका, ज्यामुळे फायनलमध्ये हरली टीम इंडिया
ind vs aus wtc final 2023
| Updated on: Jun 12, 2023 | 9:27 AM
Share

लंडन : भारतीय क्रिकेट टीमला आयसीसी ट्रॉफी जेतेपदाचा दुष्काळ संपवता आला नाही. भारताला रविवारी आयसीसी WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने हरवलं. भारताला 2013 नतंर एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाहीय. यावेळी टीम इंडियाकडे दुष्काळ संपवण्याची संधी होती. पण असं झालं नाही. ऑस्ट्रेलियाने भारताच स्वप्न मोडलं. ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी मॅच जिंकली. टीम इंडियाच ऑस्ट्रेलियासमोर काहीच चाललं नाही. या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवलं.

टीम इंडियाने या मॅचमध्ये फक्त टॉस जिंकला. त्यानंतर सर्वच सेशनमध्ये ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवलं. पहिली बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियाने 469 धावांचा डोंगर उभारला. तिथेच सामना भारताच्या हातून निसटला होता. टीम इंडियाने पाच दिवसात पाच चूका केल्या. त्यामुळे पराभव झाल.

1 – टीम इंडियाची गोलंदाजी WTC फायनलमध्ये प्रभावी ठरली नाही. टीम इंडियाचा कुठलाही गोलंदाज स्टीव स्मिथ, ट्रेविस हेडला रोखू शकला नाही. भारताने चांगली सुरुवात केली होती. ऑस्ट्रेलियाचे तीन विकेट लवकर काढले होते. त्यानंतर स्मिथ-हेड जोडीने भारतीय गोलंदाजीची लय बिघडवली. पहिल्यादिवशी लय बिघडली, त्यानंतर शेवटपर्यंत तशीच स्थिती होती.

2- ऑस्ट्रेलियाने विशाल धावसंख्या उभारली. त्यानंतर भारतीय फलंदाज धावा करतील अशी अपेक्षा होती. पण दुसऱ्यादिवशी भारतीय फलंदाज ढेपाळले. रोहित, विराट आणि चेतेश्वर सपशेल अपयशी ठरले.

3- तिसऱ्यादिवशी अजिंक्य रहाणे खेळपट्टीवर टिकून होता. तो शतकाच्या जवळ होता. पण त्याला संधी साधता आली नाही. टीम इंडिया पहिल्या डावात 300 धावाही करु शकली नाही. भारताडून फक्त दोघांनी अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूरने अर्धशतकी खेळी केली. पहिल्या डावात दोघांनी हाफ सेंच्युरी झळकवल्या.

4- चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव लवकर संपवायला हवा होता. पण असं झालं नाही. भारताला 444 रन्सच विशाल टार्गेट मिळालं. चौथ्या दिवशी रोहित शर्मा-शुभमन गिल चांगली सुरुवात देतील अशी अपेक्षा होती. पुजारा खराब शॉट खेळून आऊट झाला. 5 – पाचव्यादिवशी भारताला विजयासाठी 280 धावांची गरज होती. टीम इंडियाने चौथ्या दिवशी थोडी झुंज दिली होती. त्यामुळे पाचव्यादिवशी अपेक्षा होत्या. विराट आणि अजिंक्य क्रीजवर होते. पण कोहली खराब शॉट खेळून बाद झाला. रहाणे सुद्धा चालला नाही.

Follow Us
मतदारांवर दबाव आणण्यासाठी... बंगाल निवडणुकीबाबत राऊतांचं मोठं विधान
मतदारांवर दबाव आणण्यासाठी... बंगाल निवडणुकीबाबत राऊतांचं मोठं विधान.
विदर्भ होरपळला; अमरावतीत 46°C, सात वर्षांचा विक्रम मोडला
विदर्भ होरपळला; अमरावतीत 46°C, सात वर्षांचा विक्रम मोडला.
मराठी सक्तीवरून मुंबईत राजकारण तापलं; मुंडेंचा मराठी माणसालाच इशारा?
मराठी सक्तीवरून मुंबईत राजकारण तापलं; मुंडेंचा मराठी माणसालाच इशारा?.
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका.
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच..
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच...
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स.
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण.
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो...
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो....
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार.
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट...
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट....