AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | KKR vs MI, IPL 2022: सलग तिसऱ्या दारुण पराभवानंतर रोहित शर्मा संतापला, कॅमेरासमोर म्हणाला…

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (MI) ची 2022 च्या हंगामात अतिशय खराब सुरुवात झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने चालू हंगामात तीन सामने खेळले आणि तिन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

VIDEO | KKR vs MI, IPL 2022: सलग तिसऱ्या दारुण पराभवानंतर रोहित शर्मा संतापला, कॅमेरासमोर म्हणाला...
Rohit Sharma Image Credit source: twitter
| Updated on: Apr 07, 2022 | 1:12 PM
Share

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (MI) ची 2022 च्या हंगामात अतिशय खराब सुरुवात झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने चालू हंगामात तीन सामने खेळले आणि तिन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मंगळवारी खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या सामन्यात मुंबईला कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) पराभव स्वीकारावा लागला. कोलकात्याविरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्मा संतापलेला दिसत होता. सामना संपल्यानंतर त्याला पत्रकार परिषदेला सामोरं जावं लागलं. तो यावेळी त्याच्या नेहमीच्या कूल अंदाजात दिसला नाही. तर तो संतापलेला वाटत होता. तो यावेळी हताश झाला होता. कॅमेऱ्यासमोर आल्यानंतर रोहित स्वतःला अॅडजस्ट करत असताना डॅनी मॉरिसन या व्यक्तीने त्याला प्रश्न विचारला. रोहितला कदाचित त्याचा प्रश्न ऐकू आला नाही आणि त्याने त्याला आवाज वाढवायला सांगितले. ही बाब कॅमेऱ्यात कैद झाली. यामध्ये रोहित हताशपणे बोलत असल्याचे दिसत आहे. रोहित म्हणाला, ‘आवाज बढाओं यार थोड़ा’. प्रश्न विचारणाऱ्या मॉरिसनला रोहितचं हे बोलणं आवडलं नाही तरीही तो शांत राहिला.

रोहितकडून पॅट कमिन्सचं कौतुक

रोहित म्हणाला की, “कमिन्सकडून अजिबात अशा खेळीची अपेक्षा नव्हती. तो येऊन अशी धडाकेबाज खेळी खेळेल असं जरादेखील वाटलं नव्हतं. या विजयाचं संपूर्ण श्रेय त्यालाच जातं. खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती. आमची सुरुवात चांगली झाली नसली तरी शेवटच्या 4-5 षटकांमध्ये आम्ही 70 पेक्षा जास्त धावा केल्या, ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. गोलंदाजीत आम्ही सुरुवातीची 14 षटकं चांगली टाकली. पण कमिन्सची खेळी खूपच चांगली होती.”

कमिन्स आणि व्यंकटेशची अर्धशतकं

या सामन्यात कोलकाता संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय जलदगती गोलंदाज उमेश यादवने सार्थ ठरवला. त्याने पहिल्या षटकात केवळ एक धाव दिली. तर तिसऱ्या षटकात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला माघारी धाडलं. मुंबईने 11 षटकात 55 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. यानंतर सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने 4 बाद 161 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता संघाने 5 विकेट्सच्या बदल्यात 162 धावा करून सामना जिंकला. पॅट कमिन्सने 15 चेंडूत नाबाद 56 धावा केल्या. तर सलामीवीर व्यंकटेश अय्यरने 41 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या.

इतर बातम्या

KKR vs MI IPL Match Result: पॅट कमिन्सच्या वादळात मुंबई इंडियन्स उद्धवस्त, एक ओव्हरमध्ये चोपल्या 35 धावा

MI vs KKR kieron pollard: पोलार्ड तात्या अजूनही तितकाच डेंजरस, पाच बॉलमध्ये दाखवून दिलं

KKR vs MI Rohit Sharma: उमेश यादव समोर रोहित शर्मा हतबल, IPL मध्ये आतापर्यंत इतकावेळ घेतला विकेट

Follow Us
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.