AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma | तुम्ही रवींद्र जाडेजाबद्दल का नाही बोलत? ‘त्या’ प्रश्नावर खवळलेल्या रोहित शर्माचा प्रतिप्रश्न

Rohit Sharma | पत्रकारांनी रोहित शर्माला असा नेमका कुठला प्रश्न विचारला. . रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना शेवटच्या दोन वनडेसाठी विश्रांती देण्यात आली होती. सध्या टीम इंडिया पाच सामन्यांची टी 20 सीरीज खेळत आहे.

Rohit Sharma | तुम्ही रवींद्र जाडेजाबद्दल का नाही बोलत? 'त्या' प्रश्नावर खवळलेल्या रोहित शर्माचा प्रतिप्रश्न
rohit sharma
| Updated on: Aug 11, 2023 | 3:10 PM
Share

नवी दिल्ली : वनडे वर्ल्ड कपसाठी आता जास्तवेळ उरलेला नाहीय. यावर्षी पाच ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान वनडे वर्ल्ड कप टुर्नामेंट होणार आहे. या वर्ल्ड कप आधी टीम इंडिया अनेक प्रयोग करत आहे. अलीकडेच वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या वनडे सीरीजमध्ये हे पहायला मिळालं. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना शेवटच्या दोन वनडेसाठी विश्रांती देण्यात आली होती. सध्या टीम इंडिया पाच सामन्यांची टी 20 सीरीज खेळत आहे.

या सीरीजमध्ये रोहित आणि कोहली टीमचा भाग नाहीयत. रोहितने वनडे वर्ल्ड कपआधी अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्याबद्दल आपलं मत मांडलं.

सुरुवातीचे दोन सामने गमावले, पण….

रोहितला टीममधील महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्याने मोकळेपणाने आपलं मत मांडलं. T20 सीरीज सुरु असताना का आराम करतोय, ते रोहितने सांगितलं. टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध पाच टी 20 सामन्यांची सीरीज खेळत आहे. सुरुवातीचे दोन सामने टीम इंडियाने गमावले. पण तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला.

त्याच्यावरुन तुम्ही प्रश्न का विचारत नाही?

मागच्यावर्षी T20 वर्ल्ड कप झाला. त्यावेळी सुद्धा सिनियर खेळाडू वनडेमध्ये खेळले नव्हते. यावेळी सुद्धा आम्ही हेच करतोय. त्यामुळे टी 20 खेळत नाहीय, असं रोहितने सांगितलं. तुम्ही सगळ्याच ठिकाणी खेळू शकत नाही. त्याने रवींद्र जाडेजाच नाव घेतलं. जाडेजा सुद्धा टी 20 खेळत नाहीय. त्याच्यावरुन तुम्ही प्रश्न का विचारत नाही. सर्व फोकस माझ्यावर आणि कोहलीवर का? असं रोहित शर्मा म्हणाला. आता तेच घडतय

रोहितच्या नेतृत्वाखाली मागच्यावर्षी टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप खेळला होता. त्यात सेमीफायनलमध्ये इंग्लंड टीमने टीम इंडियाचा पराभव केला होता. त्यानंतर रोहित आणि कोहली भारतासाठी टी 20 मॅच खेळलेले नाहीत. हार्दिक पांड्या आता टी 20 मध्ये कॅप्टन आहे. टी 20 वर्ल्ड कपनंतर रोहित-विराटला संधी मिळणार नाही, असं बोललं जात होतं. आता तेच घडतय.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.