AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma | तुम्ही रवींद्र जाडेजाबद्दल का नाही बोलत? ‘त्या’ प्रश्नावर खवळलेल्या रोहित शर्माचा प्रतिप्रश्न

Rohit Sharma | पत्रकारांनी रोहित शर्माला असा नेमका कुठला प्रश्न विचारला. . रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना शेवटच्या दोन वनडेसाठी विश्रांती देण्यात आली होती. सध्या टीम इंडिया पाच सामन्यांची टी 20 सीरीज खेळत आहे.

Rohit Sharma | तुम्ही रवींद्र जाडेजाबद्दल का नाही बोलत? 'त्या' प्रश्नावर खवळलेल्या रोहित शर्माचा प्रतिप्रश्न
rohit sharma
| Updated on: Aug 11, 2023 | 3:10 PM
Share

नवी दिल्ली : वनडे वर्ल्ड कपसाठी आता जास्तवेळ उरलेला नाहीय. यावर्षी पाच ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान वनडे वर्ल्ड कप टुर्नामेंट होणार आहे. या वर्ल्ड कप आधी टीम इंडिया अनेक प्रयोग करत आहे. अलीकडेच वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या वनडे सीरीजमध्ये हे पहायला मिळालं. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना शेवटच्या दोन वनडेसाठी विश्रांती देण्यात आली होती. सध्या टीम इंडिया पाच सामन्यांची टी 20 सीरीज खेळत आहे.

या सीरीजमध्ये रोहित आणि कोहली टीमचा भाग नाहीयत. रोहितने वनडे वर्ल्ड कपआधी अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्याबद्दल आपलं मत मांडलं.

सुरुवातीचे दोन सामने गमावले, पण….

रोहितला टीममधील महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्याने मोकळेपणाने आपलं मत मांडलं. T20 सीरीज सुरु असताना का आराम करतोय, ते रोहितने सांगितलं. टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध पाच टी 20 सामन्यांची सीरीज खेळत आहे. सुरुवातीचे दोन सामने टीम इंडियाने गमावले. पण तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला.

त्याच्यावरुन तुम्ही प्रश्न का विचारत नाही?

मागच्यावर्षी T20 वर्ल्ड कप झाला. त्यावेळी सुद्धा सिनियर खेळाडू वनडेमध्ये खेळले नव्हते. यावेळी सुद्धा आम्ही हेच करतोय. त्यामुळे टी 20 खेळत नाहीय, असं रोहितने सांगितलं. तुम्ही सगळ्याच ठिकाणी खेळू शकत नाही. त्याने रवींद्र जाडेजाच नाव घेतलं. जाडेजा सुद्धा टी 20 खेळत नाहीय. त्याच्यावरुन तुम्ही प्रश्न का विचारत नाही. सर्व फोकस माझ्यावर आणि कोहलीवर का? असं रोहित शर्मा म्हणाला. आता तेच घडतय

रोहितच्या नेतृत्वाखाली मागच्यावर्षी टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप खेळला होता. त्यात सेमीफायनलमध्ये इंग्लंड टीमने टीम इंडियाचा पराभव केला होता. त्यानंतर रोहित आणि कोहली भारतासाठी टी 20 मॅच खेळलेले नाहीत. हार्दिक पांड्या आता टी 20 मध्ये कॅप्टन आहे. टी 20 वर्ल्ड कपनंतर रोहित-विराटला संधी मिळणार नाही, असं बोललं जात होतं. आता तेच घडतय.

Follow Us
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.
पहलगाम हल्ल्यातील शहीद आदिल शहाच्या कुटुंबासाठी उभारलं नवं घर
पहलगाम हल्ल्यातील शहीद आदिल शहाच्या कुटुंबासाठी उभारलं नवं घर.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वीच ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का, नेमकं
पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वीच ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का, नेमकं.
महिला आरक्षणावरून राजकारण तापलं; खोटं कितीही बोललं तरी सत्य कायम राहतं
महिला आरक्षणावरून राजकारण तापलं; खोटं कितीही बोललं तरी सत्य कायम राहतं.
खरातच्या गुन्ह्यांचा अंतच नाही! नाशिकच्या सिन्नरमध्ये 15वा गुन्हा दाखल
खरातच्या गुन्ह्यांचा अंतच नाही! नाशिकच्या सिन्नरमध्ये 15वा गुन्हा दाखल.
सुळे यांचा थेट सरकारला सवाल, विधेयक मंजूर, मग अंमलबजावणी का नाही?
सुळे यांचा थेट सरकारला सवाल, विधेयक मंजूर, मग अंमलबजावणी का नाही?.
महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय घमासान; मुख्यमंत्री फडणवीसांचे आव्हान
महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय घमासान; मुख्यमंत्री फडणवीसांचे आव्हान.
भाजपवाले काय म्हणतात ते त्यांनाही कळत नाही, ही जप्त केलेल्या ड्रग्सची
भाजपवाले काय म्हणतात ते त्यांनाही कळत नाही, ही जप्त केलेल्या ड्रग्सची.