AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL साठी धोक्याची घंटा, भारतीय खेळाडूंना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न, बीसीसीआयही तयार?

आयपीएल लीगचे चाहते जगातील प्रत्येक देशात आहेत. विविध देशातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात. मात्र आता आयपीएलला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा क्रिकेट विश्वात रंगली आहे. जाणून घ्या..

IPL साठी धोक्याची घंटा, भारतीय खेळाडूंना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न, बीसीसीआयही तयार?
| Updated on: Apr 14, 2023 | 5:54 PM
Share

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात आतापर्यंत प्रत्येक संघाने आपले किमान 2-3 सामने खेळले आहेत. आतापर्यंत एकूण 17 सामन्यांचं यशस्वीपणे आयोजन करण्यात आलं आहे. यंदा जिओ सिनेमा एपमुळे एकूण 12 भाषांमध्ये क्रिकेट कॉमेंट्री ऐकायलाही मिळत आहे. त्यामुळे क्रिकेट चाहते आयपीएलकडे ओढले गेले आहेत. दरवर्षी आयपीएल पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आयपीएलला दिवसेंदिवस प्रसिद्धी मिळतेय, हे सर्वश्रूत आहे. आयपीएलची प्रसिद्धी पाहता अनेक देशांमध्ये बीपीएल, पीएसल या आणि अशा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. यावरुन आयपीएलच्या प्रसिद्धीचा आणि टी 20 क्रिकेटला मिळणारा वाढता प्रतिसाद दिसून येतो.

आयपीएलमुळे अनेक युवा खेळाडूंना आपल्यातील हुशारी दाखवण्याची संधी मिळाली. आयपीएलमुळे अनेक खेळाडूंची आर्थिक स्थिती सुधारली. काही खेळाडूंना थेट टीम इंडियात खेळण्याची संधी मिळाली. थोडक्यात काय तर आयपीएलने पैसा, प्रसिद्धी आणि संधी अशा सर्व गोष्टी उपलब्ध करुन दिलीय. आयपीएल जगातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध लीग आहे. मात्र या आयपीएलवर वाकडी नजर पडली आहे. आयपीएलला असलेलं सर्वात मोठ्या स्पर्धेचं स्टेटस हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरु झाल्यासं समोर आलं आहे. हे नक्की प्रकरण काय आहे, हे आपण जाणून घेऊयात.

सौदी अरेबिया मोठा डाव रचत आहे. जगातील सर्वात श्रीमंत टी 20 स्पर्धेचं आयोजन करण्याचा प्लान सौदी अरेबिया करक असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सौदी अरेबियाने आमच्याकडे जगातील सर्वात श्रीमंत टी 20 लीगचं आयोजन करा, असा प्रस्ताव आयपीएल मालकांना दिल्याचं म्हटलं जात आहे. नियमांनुसार, भारतीय खेळाडूंना कोणत्याही परदेशी लीग स्पर्धेत सहभागी होता येत नाही. खेळाडूंना खेळायचं असेल, तर निवृत्ती घेऊनच खेळता येतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मनिष पांडे.

द एजच्या रिपोर्टनुसार, सौदी अरेबिया लीग बाबत जवळपास एक वर्षापासून चर्चा सुरु आहे. या लीग स्पर्धेसाठी आयसीसी आणि इतर संबंधित बोर्डाची परवानगी लागते. सौदी अरेबियाने गेल्या वर्षभरात क्रीडा क्षेत्रात भर दिला आहे.

सौदी अरेबिया सरकारने गोल्फमध्ये Liv Golf पासून सुरुवात केली होती. या शिवाय आता फुटबॉल आणि एफ 1 नंतर क्रिकेटकडे लक्ष आहे. काही दिवसांपूर्वीच आयसीसी अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी सौदी अरेबिया क्रिकेटसाठी इच्छूक असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान आता सौदी अरेबियाचा जगातील सर्वात श्रीमंत टी 20 लीग स्पर्धेच्या प्रस्तावाचं काय होतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे.

Follow Us
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा जीव वाचवला, व्हिडिओ बघाच!
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...
Eknath Shinde | सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांना हे चिन्ह...
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक