.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs IND 3rd T20I Super Over: टीम इंडियाला सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 3 धावांंचं आव्हान

Sri Lanka vs India Super Over: टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा सामना हा बरोबरीत सुटल्याने आता सुपर ओव्हर होणार आहे.

SL vs IND 3rd T20I Super Over: टीम इंडियाला सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 3 धावांंचं आव्हान
super over
| Updated on: Jul 31, 2024 | 1:15 AM
Share

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा आणि शेवटचा सामना हा टाय झाला आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 138 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 3 धावांची गरज होती. तेव्हा श्रीलंकेच्या फलंदाजांनी 2 धावा केल्या. त्यामुळे सामना टाय झाला. त्यामुळे आता सुपर ओव्हरने निकाल लागणार आहे. श्रीलंकेने पहिले बॅटिंग केली. तर टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदर याने बॉलिंग केली. वॉशिंग्टने श्रीलंकेच्या कुसल परेरा आणि निसंका या दोघांना आऊट केलं. सुपर ओव्हरमध्ये 2 विकेट्सची मर्यादा असते. त्यामुळे भारताला अवघ्या 3 धावांचं आव्हान मिळालं आहे.

त्याआधी भारताने श्रीलंकेला विजयासाठी 138 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा श्रीलंकेने शानदार पाठलाग केला. आता श्रीलंकेला विजयासाठी शेवटच्या 12 बॉलमध्ये 9 धावांची गरज होती. मात्र रिंकू सिंह आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव यांनी बॅटिंगने नाही, तर बॉलिंगने मॅच फिरवली.  रिंकूने श्रीलंकेच्या डावातील 19 वी ओव्हर टाकली. रिंकूने या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे श्रीलंकेला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 6 धावा करायच्या होत्या. सूर्याने शेवटची ओव्हर करण्याचा निर्णय घेतला. सूर्यानेही आपल्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेतल्या. श्रीलंकेला विजयासाठी शेवटच्या बॉलमध्ये विजयासाठी 3 धावा पाहिजे होत्या. मात्र श्रीलंकेच्या फलंदाजांना फक्त 2 धावा करता आल्या. त्यांना सामना जिंकून देता आला नाही. मात्र सामना बरोबरीत सोडवला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये पोहचला.  आता हा सामना टीम इंडिया जिंकून विजयी हॅटट्रिक पूर्ण करते? की श्रीलंका विजय. मिळवून शेवट गोड करणार? हे काही मिनिटात स्पष्ट होईल.

श्रीलंका-भारत तिसरा टी20i सामना टाय

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : चरित असलंका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महीश तीक्षाना, मथीशा पाथिराना आणि असिथा फर्नांडो.

Follow Us
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....