AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs IND 3rd T20i: तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार? सूर्याने काय सांगितलं?

Sri Lanka vs India 3rd T20i Playing 11: टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यासाठी संघात बदल होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

SL vs IND 3rd T20i: तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार? सूर्याने काय सांगितलं?
team india playersImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Jul 29, 2024 | 10:00 PM
Share

टीम इंडियाने पल्लेकेले येथे रविवारी 28 जुलै रोजी श्रीलंकेवर डीएलनुसार 7 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी मिळवली. श्रीलंकेने विजयासाठी 162 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाला पावसामुळे वेळ गेल्याने 8 ओव्हरमध्ये 78 धावांचं सुधारित लक्ष्य मिळालं. टीम इंडियाने हे आव्हान 6.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारताने 9 बॉल राखून 81 रन्स केल्या. भारतासाठी यशस्वी जयस्वाल, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या या तिघांनी स्फोटक खेळी केली.

सूर्याने विजयानंतर आनंद व्यक्त करताना युवा खेळाडूंचं कौतुक केलं. आता टीम इंडियाचं लक्ष्य हे तिसरा सामना जिंकून विजयी हॅटट्रिक पूर्ण करण्याकडे आहे. सूर्याला विजयानंतर तिसऱ्या सामन्यासाठी संघात बदल करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सूर्याने काय सांगितलं? हे जाणून घेऊयात.

कॅप्टन सूर्यकुमार यादवने काय सांगितंल?

सूर्यकुमार यादवला दुसऱ्या सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान तिसऱ्या आणि अखेरच्या टी 20 सामन्यातील बदलाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सूर्या म्हणाला की “आम्ही याबाबत बसून निर्णय घेऊ”.

प्रतिक्षेत असलेल्यांना संधी?

दरम्यान आता या मालिकेसाठी टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये एक तो पण नाईलाजाने बदल करण्यात आला. मानेच्या त्रासामुळे शुबमन गिल याच्या जागी संजू सॅमसन याला संधी देण्यात आली होती. तर काही खेळाडूंना संधी मिळाली नाही. यामध्ये वॉशिंग्टन सुंदर, खलील अहमद आणि शिवम दुबे या तिघांना संधी मिळाली नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात या त्रिकुटाचा समावेश होणार की नाही? हे काही तासातच स्पष्ट होईल.

टी 20 सीरिजसाठी श्रीलंका टीम: चरिथ असलांका (कॅप्टन), पथुम निसांका, कुसल परेरा ,अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चांदीमल, कामिंदु मेंडिस, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, दुनिथ वेल्लालागे ,महेश तीक्षाना,चामिंडु विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, बिनुरा फर्नांडो, दिलशान मधुशंका आणि असिथा फर्नांडो

टी20i मालिकेसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.