दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा पराभव, भारतानं मालिका 2-1ने जिंकली

दक्षिण आफ्रिकेनं भारताचा पराभव केला असला तरी टीम इंडियानं मालिकाच जिंकलीय.

दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा पराभव, भारतानं मालिका 2-1ने जिंकली
टीम इंडियानं मालिका जिंकलीImage Credit source: icc
Follow us
| Updated on: Oct 04, 2022 | 11:13 PM

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेनं (IND vs SA) तिसऱ्या टी-20 (T20) सामन्यात भारताचा 49 धावांनी पराभव केलाय. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं 20 षटकांत 3 गडी गमावून 227 धावा केल्या. रिले रुसोनं 48 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 18.3 षटकांत 178 धावांवर गारद झाला. भारताकडून दिनेश कार्तिकनं सर्वाधिक 41 धावा केल्या. मात्र, या पराभवाचा मालिकेच्या निकालावर परिणाम झाला नाही. भारतानं (Team India) याआधीच मालिका 2-1 ने जिंकली आहे. टीम इंडियानं पहिला टी-20 आठ विकेटनं आणि दुसरा टी-20 16 धावांनी जिंकला होता.

टीम इंडियानं मालिकाच जिंकली

टीम इंडियाने पहिला टी-20 आठ विकेटनं आणि दुसरा टी-20 16 धावांनी जिंकला. टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची ही शेवटची टी-20 मालिका होती. टीम इंडिया बुधवारी वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.

ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये भारताला 16 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया आणि 17 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध दोन सराव सामने खेळायचे आहेत.

गुरुवारपासून शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. T20 विश्वचषकासाठी निवडलेल्या संघातील एकही खेळाडू वनडे संघात नाही. श्रेयस अय्यरला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

यामध्ये भारताचे युवा स्टार्स दक्षिण आफ्रिकेचा सामना करताना दिसणार आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या संघात तेच खेळाडू असतील, जे सध्या टी-20 मालिकेचा भाग होते. 6, 9 आणि 11 ऑक्टोबरला तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.