पोस्ट डिलिट आणि अनफॉलो केलं..! सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याचं काय झालं? मुंबई इंडियन्स सोडणार?

आयपीएल 2026 स्पर्धा संपली असली तरी वाद काही संपलेले नाहीत. आरसीबीने दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली. तर मुंबई इंडियन्सला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. असं असताना हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्यात बिनसल्याची चर्चा आहे.

पोस्ट डिलिट आणि अनफॉलो केलं..! सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याचं काय झालं? मुंबई इंडियन्स सोडणार?
पोस्ट डिलिट आणि अनफॉलो केलं..! सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याचं काय झालं? मुंबई इंडियन्स सोडणार?
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 10, 2026 | 7:32 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने निराशाजनक कामगिरी केली. मुंबई इंडियन्सला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. असं असताना सूर्यकुमार यादवबाबत काही वावड्या उठल्या आहेत. सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सला अनफॉलो करणं असो, त्यानंतर पुन्हा फॉलो केलं आणि आता फ्रेंचायझीशी निगडीत काही पोस्ट डिलिट करणं चर्चेचा विषय ठरला आहे. सूर्यकुमार यादव फ्रेंचायझीला फॉलो करत आहे. पण संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याला मात्र फॉलो केलेलं नाही. सध्या तरी सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स संघात आहे. फ्रेंचायझीकडून त्याला रिलीज किंवा ट्रेड करण्याबाबत काहीच हालचाली नाहीत. पण हार्दिक पांड्याबाबत फ्रेंचायझी नाराज असल्याची चर्चा आहे.

हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सचं तीन पर्वात नेतृत्व केलं. पहिल्या पर्वात निराशा पदरी पडली. दुसऱ्या पर्वात क्वॉलिफायर 2 फेरीपर्यंत मजल मारली. तर यंदा साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं. यावेळी सूर्यकुमार यादवला हार्दिकच्या नेतृत्वात खेळावं लागलं. त्यामुळे या दोघांत काहीतरी बिनसलं असावं अशी चर्चा आहे. या दरम्यान, हार्दिक पांड्या संघातील वरिष्ठ खेळाडूंची साथ मिळाली नाही अशीही चर्चा आहे. यात सूर्यकुमार यादवही असल्याची चर्चा क्रीडाप्रेमी सोशल मीडियावर करत आहेत. कारण या दोघांनी सोशल मीडियावर मैत्री संपुष्टात आणली आहे.

दरम्यान, टीम इंडियाचं कर्णधारपद एक मोठं कारण असू शकतं. रोहित शर्माने निवृत्ती घेतल्यानंतर हार्दिक पांड्या कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर होता. रोहितनंतर त्याने कर्णधारपद भूषवलं. पण दुखापतीमुळे आत बाहेर राहिला आणि सूर्यकुमारला कर्णधारपद मिळालं. त्यामुळे मनात कुठे ना कुठे तरी काही तरी सळ असेलच. त्यात श्रेयस अय्यरच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने निराशाजनक कामगिरी केली. पराभवासह नेट रनरेटही सुमार असल्याने गुणतालिकेत सर्वात खाली राहावं लागलं. या मानहानीकारक पराभवानंतर फ्रेंचायझीमध्ये मंथन सुरू झालं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्स संघ नव्या कर्णधाराचा विचार करत आहे. पण सध्या तरी त्याबाबत काहीच चर्चा नाही. मुंबई इंडियन्सने या पर्वात कर्णधारपदाचे अनेक पर्याय शोधले. हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी संघाचं नेतृत्व सांभाळलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us