AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्पाईक घालून का पळतो रे? श्रीलंकन कॅप्टन संतापला; क्रिकेटच्या मैदानात वातावरण तापलं; नेमकं काय घडलं!

IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना निर्णायक स्थितीत आहे. खरं तर हा सामना पूर्णपणे भारताच्या पारड्यात झुकलेला आहे. असं असताना श्रीलंकन कर्णधाराने भारतीय संघावर मोठा आरोप केला आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या...

स्पाईक घालून का पळतो रे? श्रीलंकन कॅप्टन संतापला; क्रिकेटच्या मैदानात वातावरण तापलं; नेमकं काय घडलं!
स्पाईक घालून का पळतो रे? श्रीलंकन कॅप्टन संतापला; क्रिकेटच्या मैदानात वातावरण तापलं; नेमकं काय घडलं!Image Credit source: PTI
| Updated on: Aug 18, 2026 | 5:50 PM
Share

भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना गॉलमध्ये सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारताला 178 धावांची मजबूत आघाडी मिळाली होती. त्यापुढे खेळताना भारतीय संघाने दुसऱ्या डावात 193 धावा केल्या आणि एकूण 371 धावा बोर्डवर लावल्या. यासह श्रीलंकेसमोर विजयासाठी 372 धावांचं किचकट आव्हान दिलं आहे. गॉल आंतरराष्ट्रीय मैदानाची मागची आकडेवारी पाहून तसंच म्हणावं लागेल. कारण या खेळपट्टीवर चौथ्या डावात इतका मोठा स्कोअर गाठणं कठीण आहे. असं असताना दुसर्‍या डावात भारतीय संघ फलंदाजी करत होता, तेव्हा श्रीलंकन कर्णधाराचं डोकं फिरलं. कर्णधार धनंजय डी सिल्वा याने चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सेशनमध्ये मानव सुथारची तक्रार पंचांकडे केली. मानव सुथार जाणीवपूर्वक खेळपट्टीच्या मधून धावत असल्याचा आरोप श्रीलंकन कर्णधार धनंजय डी सिल्वा याने केला.

मानव सुथारमुळे खेळपट्टीचं नुकसान?

भारताच्या दुसऱ्या डावात मानव सुथार फलंदाजी करत असताना एक धाव घेण्यासाठी धावला.  पण ही धाव घेतान खेळपट्टीच्या प्रतिबंधित भागातून धावला. त्याची ही कृती पाहिल्यानंतर श्रीलंकन कर्णधार धनंजय डिसिल्वा थेट पाकिस्तानी पंच एहसान रजा यांच्याकडे गेला आणि मानव सुथारची तक्रार केली. मानव सुथार हाफ स्पाइक्स घालून फलंदाजी करत होता. त्यामुळे खेळपट्टीच्या मधून धावला तर नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. जर असं काही झालं तर चौथ्या डावात खेळपट्टीवर फलंदाजांना फलंदाजी करणं कठीण जाईल. श्रीलंकेला विजयी धावांचा पाठलाग करायचा असल्याने कर्णधाराची चिंता सहाजिकच आहे. अनेकदा क्रिकेटमध्ये शेपटाच्या फलंदाजांकडून अशी कृती होत असते. त्यामुळे पंच सावध असतात.

अनेकदा खेळाडू खेळपट्टी खडबडीत करण्यासाठी असं काही करत असतात. पण पंचांच्या ही बाब लक्षात आली तर तात्काळ दंडही ठोठावला जातो. फलंदाजाने अशी कृती केली तर पंच त्याला पहिली आणि शेवटची वॉर्निंग देतात. हा इशारा संपूर्ण सामन्यासाठी असतो. पण त्यानंतरही फलंदाजाने अशी कृती केली तर त्या चेंडूवरच्या धावा रद्द केल्या जातात. तसेच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला अतिरिक्त पाच धावा मिळतात.

Follow Us
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात