AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021 मध्ये दोन गोष्टी घातक ठरल्या, सुनील गावसकरांनी सांगितली टीम इंडियाच्या फ्लॉप शोची कारणं

2021 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा खेळ संपला आहे. संघाला सुपर 12 स्टेजवरुनच आता बॅग पॅक करुन परतावं लागणार आहे. भारतीय खेळाडूंची खराब कामगिरी यामागचं प्रमुख कारण ठरली.

T20 World Cup 2021 मध्ये दोन गोष्टी घातक ठरल्या, सुनील गावसकरांनी सांगितली टीम इंडियाच्या फ्लॉप शोची कारणं
Sunil Gavaskar
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 08, 2021 | 12:50 PM
Share

मुंबई : 2021 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा खेळ संपला आहे. संघाला सुपर 12 स्टेजवरुनच आता बॅग पॅक करुन परतावं लागणार आहे. भारतीय खेळाडूंची खराब कामगिरी यामागचं प्रमुख कारण ठरली. पण एवढी खराब कामगिरी का झाली, हा प्रश्नदेखील आहेच. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असतानाही टीम इंडियाने स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यापूर्वी गुडघे का टेकले. दिग्गज माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारताच्या पराभवामागची किंवा खराब कामगिरीची दोन कारणं सांगितली आहे. स्पोर्ट्स तकशी बोलताना त्यांनी या दोन्ही गोष्टींकडे लक्ष वेधले आहे. (Sunil Gavaskar marks 2 reasons behind team India’s flop show in T20 World Cup 2021)

सुनील गावसकर यांनी दोन जीवघेण्या गोष्टी टीम इंडियाच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याची दोन मोठी कारणे म्हणून पाहिल्या. या दोन गोष्टी विराट अँड कंपनीच्या फ्लॉप शोचे कारण असल्याचे गावसकर यांनी सांगितले. गावसकर यांनी ज्या दोन गोष्टी निदर्शनास आणून दिल्या त्या त्यांच्या फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाशी संबंधित आहेत.

पॉवरप्लेचा योग्य वापर केला नाही

भारताचे माजी कर्णधार आणि सलामीवीर सुनील गावसकर यांच्या मते, टीम इंडियाच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याचे पहिले प्रमुख कारण म्हणजे फलंदाजांनी पॉवरप्लेचा चांगला उपयोग न करणे. ही समस्या केवळ या स्पर्धेचीच नाही तर याआधी खेळलेल्या आयसीसी स्पर्धेतही अशी परिस्थिती होती. गावसकर म्हणाले, “ज्या प्रकारची फलंदाजी पहिल्या 6 षटकांमध्ये व्हायला हवी होती, ती दिसली नाही. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांनी त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही, ज्याचा फटका संघाला सहन करावा लागला. पहिल्या 6 षटकांमध्ये फक्त 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. मात्र याचा फायदा भारताने घेतला नाही. गेल्या अनेक स्पर्धांमध्ये भारताला याचा फायदा घेता आलेला नाही. तगड्या प्रतिस्पर्ध्यासमोर भारतीय संघ मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला आहे.

ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे सामने निसटले

गावसकर यांनी भारताच्या फ्लॉप शोचे दुसरे कारण क्षेत्ररक्षण असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, “तुम्ही न्यूझीलंडचे क्षेत्ररक्षण पाहा, ते ज्या पद्धतीने चेंडू स्विंग करतात, धावा वाचवतात, झेल घेतात, ते केवळ आश्चर्यकारक आहे. आक्रमणात जीव नसला तरी आणि खेळपट्टी सपाट असली तरी उत्तम क्षेत्ररक्षणामुळे सामन्यात फरक पडू शकतो. पण जर तुम्ही भारतीय संघ पाहिला तर 3-4 खेळाडू वगळता इतर खेळाडूंकडून धावा वाचवण्याची किंवा मैदानावर डाईव्ह मारण्याची अपेक्षा तुम्ही करू शकत नाही.”

इतर बातम्या

…तर भारतीय संघ T20 World Cup मध्ये चांगली कामगिरी करु शकला असता; प्रशिक्षकांनी सांगितली पराभवामागची कारणं

पाकिस्तानच्या खेळाडूचा धमाका, विश्वचषकातील खेळीने तोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड, कोहलीसह बाबरलाही टाकलं मागे

T20 World Cup India vs Namibia live streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारताचा विश्वचषकातील शेवटचा सामना

(Sunil Gavaskar marks 2 reasons behind team India’s flop show in T20 World Cup 2021)

Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...