…तर भारतीय संघ T20 World Cup मध्ये चांगली कामगिरी करु शकला असता; प्रशिक्षकांनी सांगितली पराभवामागची कारणं

ICC T20 विश्वचषक 2021 मधील शेवटचा साखळी सामना खेळण्यापूर्वीच भारतीय संघाचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, विजेतेपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक असलेल्या भारतीय संघाला ग्रुप स्टेजमधूनच बाद व्हावे लागले आहे.

...तर भारतीय संघ T20 World Cup मध्ये चांगली कामगिरी करु शकला असता; प्रशिक्षकांनी सांगितली पराभवामागची कारणं
team India
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 12:12 PM

मुंबई : ICC T20 विश्वचषक 2021 मधील शेवटचा साखळी सामना खेळण्यापूर्वीच भारतीय संघाचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, विजेतेपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक असलेल्या भारतीय संघाला ग्रुप स्टेजमधूनच बाद व्हावे लागले आहे. गेल्या 9 वर्षात पहिल्यांदाच भारतीय संघ कोणत्याही आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. (Bharat Arun says, a small break between IPL 2021 and T20 World Cup would be helpful fro Team India)

भारतीय संघ पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध चांगली कामगिरी चांगली करु शकला नाही, त्यामुळे दोन्ही संघांविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाला आणि भारतीय संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर गेला. भारतीय संघाच्या या वाईट कामगिरीमागे वेगवेगळी कारणे आहेत आणि त्यातील एक कारण म्हणजे बायो-बबल आणि सातत्याने खेळत असल्यामुळे आलेला थकवा. संघाचा वरिष्ठ गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या या वक्तव्यानंतर संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनीही त्याची पाठराखण केली आहे. आयपीएल 2021 आणि विश्वचषक दरम्यान भारतीय खेळाडूंना थोडी विश्रांती मिळाली असती तर कदाचित संघाची कामगिरी चांगली झाली नसती, असेही बुमराहने म्हटले आहे.

17 ऑक्टोबरपासून ओमान आणि UAE मध्ये सुरू झालेल्या T20 विश्वचषकापूर्वी भारतीय खेळाडू IPL 2021 च्या उत्तरार्धात जवळजवळ एक महिना व्यस्त होते. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन यूएईतच करण्यात आले होते. कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल या खेळाडूंनी या काळात आपापल्या संघासाठी जवळपास सर्व सामने खेळले. आयपीएल सुरू होण्याच्या एक आठवड्यापूर्वी, कोहली, रोहित, राहुल, बुमराह आणि शमी सारखे भारतीय खेळाडू जवळजवळ 3 महिने इंग्लंडमध्ये होते जिथे त्यांनी 5 कसोटी सामने खेळले. यादरम्यान भारतीय खेळाडू अनेक दिवस बायो-बबलमध्ये राहिले. म्हणजेच भारतीय खेळाडू सतत व्यस्त होते.

IPL आणि T20 World Cup दरम्यान ब्रेक मिळाला फायदा झाला असता

टीम इंडियासोबत अखेरच्या काही दिवसांचा वेळ घालवत असलेले गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी नामिबियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, “वरवर पाहता संघाच्या खराब कामगिरीच्या अनेक कारणांपैकी एक कारण संघाला विश्रांतीची संधी न मिळणे हे देखील होते.”

अरुण म्हणाले की, “6 महिने घरापासून दूर राहणे ही मोठी गोष्ट आहे. मला वाटते की गेल्या आयपीएलच्या निलंबनानंतर त्यांना छोटा ब्रेक मिळाला होता, तेव्हापासून खेळाडू घरी गेलेले नाहीत. ते 6 महिन्यांपासून बायो-बबलमध्ये आहेत आणि याचा शरीरावर खूप परिणाम होतो. आयपीएल आणि विश्वचषक यांच्यातील एक छोटा ब्रेक खेळाडूंसाठी फायदेशीर ठरू शकला असता.”

इतर बातम्या

पाकिस्तानच्या खेळाडूचा धमाका, विश्वचषकातील खेळीने तोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड, कोहलीसह बाबरलाही टाकलं मागे

T20 World Cup India vs Namibia live streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारताचा विश्वचषकातील शेवटचा सामना

(Bharat Arun says, a small break between IPL 2021 and T20 World Cup would be helpful fro Team India)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.