AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर भारतीय संघ T20 World Cup मध्ये चांगली कामगिरी करु शकला असता; प्रशिक्षकांनी सांगितली पराभवामागची कारणं

ICC T20 विश्वचषक 2021 मधील शेवटचा साखळी सामना खेळण्यापूर्वीच भारतीय संघाचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, विजेतेपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक असलेल्या भारतीय संघाला ग्रुप स्टेजमधूनच बाद व्हावे लागले आहे.

...तर भारतीय संघ T20 World Cup मध्ये चांगली कामगिरी करु शकला असता; प्रशिक्षकांनी सांगितली पराभवामागची कारणं
team India
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 08, 2021 | 12:12 PM
Share

मुंबई : ICC T20 विश्वचषक 2021 मधील शेवटचा साखळी सामना खेळण्यापूर्वीच भारतीय संघाचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, विजेतेपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक असलेल्या भारतीय संघाला ग्रुप स्टेजमधूनच बाद व्हावे लागले आहे. गेल्या 9 वर्षात पहिल्यांदाच भारतीय संघ कोणत्याही आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. (Bharat Arun says, a small break between IPL 2021 and T20 World Cup would be helpful fro Team India)

भारतीय संघ पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध चांगली कामगिरी चांगली करु शकला नाही, त्यामुळे दोन्ही संघांविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाला आणि भारतीय संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर गेला. भारतीय संघाच्या या वाईट कामगिरीमागे वेगवेगळी कारणे आहेत आणि त्यातील एक कारण म्हणजे बायो-बबल आणि सातत्याने खेळत असल्यामुळे आलेला थकवा. संघाचा वरिष्ठ गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या या वक्तव्यानंतर संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनीही त्याची पाठराखण केली आहे. आयपीएल 2021 आणि विश्वचषक दरम्यान भारतीय खेळाडूंना थोडी विश्रांती मिळाली असती तर कदाचित संघाची कामगिरी चांगली झाली नसती, असेही बुमराहने म्हटले आहे.

17 ऑक्टोबरपासून ओमान आणि UAE मध्ये सुरू झालेल्या T20 विश्वचषकापूर्वी भारतीय खेळाडू IPL 2021 च्या उत्तरार्धात जवळजवळ एक महिना व्यस्त होते. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन यूएईतच करण्यात आले होते. कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल या खेळाडूंनी या काळात आपापल्या संघासाठी जवळपास सर्व सामने खेळले. आयपीएल सुरू होण्याच्या एक आठवड्यापूर्वी, कोहली, रोहित, राहुल, बुमराह आणि शमी सारखे भारतीय खेळाडू जवळजवळ 3 महिने इंग्लंडमध्ये होते जिथे त्यांनी 5 कसोटी सामने खेळले. यादरम्यान भारतीय खेळाडू अनेक दिवस बायो-बबलमध्ये राहिले. म्हणजेच भारतीय खेळाडू सतत व्यस्त होते.

IPL आणि T20 World Cup दरम्यान ब्रेक मिळाला फायदा झाला असता

टीम इंडियासोबत अखेरच्या काही दिवसांचा वेळ घालवत असलेले गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी नामिबियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, “वरवर पाहता संघाच्या खराब कामगिरीच्या अनेक कारणांपैकी एक कारण संघाला विश्रांतीची संधी न मिळणे हे देखील होते.”

अरुण म्हणाले की, “6 महिने घरापासून दूर राहणे ही मोठी गोष्ट आहे. मला वाटते की गेल्या आयपीएलच्या निलंबनानंतर त्यांना छोटा ब्रेक मिळाला होता, तेव्हापासून खेळाडू घरी गेलेले नाहीत. ते 6 महिन्यांपासून बायो-बबलमध्ये आहेत आणि याचा शरीरावर खूप परिणाम होतो. आयपीएल आणि विश्वचषक यांच्यातील एक छोटा ब्रेक खेळाडूंसाठी फायदेशीर ठरू शकला असता.”

इतर बातम्या

पाकिस्तानच्या खेळाडूचा धमाका, विश्वचषकातील खेळीने तोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड, कोहलीसह बाबरलाही टाकलं मागे

T20 World Cup India vs Namibia live streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारताचा विश्वचषकातील शेवटचा सामना

(Bharat Arun says, a small break between IPL 2021 and T20 World Cup would be helpful fro Team India)

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह.

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह

कॉकरोच पळवण्याचे 4 सुरक्षित घरगुती उपाय, तिसरा सर्वात खास, परत घरात दिसणारच नाहीत...

कॉकरोच पळवण्याचे 4 सुरक्षित घरगुती उपाय, तिसरा सर्वात खास, परत घरात दिसणारच नाहीत..