AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: सेमीफायनलमध्ये भारताच्या ‘या’ कमजोरीचा इंग्लंडची टीम उचलू शकते फायदा

IND vs ENG: झिम्बाब्वे विरुद्ध मॅच जिंकली पण एका गोष्टीकडे दुर्लक्ष नाही करता येणार.

IND vs ENG: सेमीफायनलमध्ये भारताच्या 'या' कमजोरीचा इंग्लंडची टीम उचलू शकते फायदा
Suryakumar-YadavImage Credit source: PTI
| Updated on: Nov 07, 2022 | 6:08 PM
Share

एडिलेड: टीम इंडिया T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. इंग्लंड विरुद्ध सेमीफायनलचा सामना होणार आहे. या टीमची एक कमकुवत बाजू आहे. टीम इंडियाकडे विकेट घेणारे स्पिनर नाहीयत. झिम्बाब्वे विरुद्ध मॅचमध्ये वेगवान गोलंदाजांनी पाच फलंदाजांना 40 पेक्षाही कमी रन्समध्ये पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

त्यांनी झटपट 50 धावांची भागीदारी केली

पण स्पिनर गोलंदाजीला आल्यानंतर झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी वेगाने धावा जमवल्या. त्यांनी झटपट 50 धावांची भागीदारी केली. स्पिनर्स संदर्भात रवी शास्त्री मधल्या ओव्हर्समध्ये कॉमेंट्री करताना म्हणाले की, “मधल्या ओव्हर्समध्ये स्पिनर्सनी विकेट घेणं गरजेच आहे. दुसऱ्या टीम्सकडे शादाब, नवाज, सेंटनर, सोढी, मोइन अली आणि आदिल राशिद सारखे गोलंदाज आहेत. ते सर्व आपल्या टीम्ससाठी महत्त्वाची भूमिका बजावतायत”‘

चहलला संधी कधी देणार?

वर्ल्ड कप सुरु झाल्यापासून टीम इंडियाकडून अश्विन आणि अक्षर पटेल या दोन फिरकी गोलंदाजांना संधी दिलीय. युजवेंद्र चहलला अजून संधी दिलेली नाही. प्लेइंग 11 मध्ये चहलला संधी न दिल्याबद्दल रवी शास्त्री यांनी आश्चर्य व्यक्त केलं. मागच्यावर्षी यूएईमध्ये टी 20 वर्ल्ड कप झाला. त्या टीममध्ये चहलची निवड झाली नाही, म्हणून मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. यावेळी सिलेक्टर्सनी आपली चूक सुधारली. पण टीम मॅनेजमेंटने अजून चहलला संधी दिली नाही.

अश्विनच काय चुकतय?

“अश्विन जो पर्यंत मध्यमगतीने गोलंदाजी करत राहील, तो पर्यंत त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित होत राहतील” असं सुनील गावस्कर म्हणाले. अश्विनने कालच्या मॅचमध्ये धीम्या गतीने गोलंदाजी करुन तीन विकेट घेतल्या. भारतासाठी पुढच्या दोन मॅचमध्ये स्पिनर्सनी विकेट घेणं गरजेच आहे.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?