AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021: भारताचा सेमीफायनलचा मार्ग खडतर, पाकिस्तान-अफगाणिस्तानकडून कोंडी

टी-20 विश्वचषकाबद्दल भारतीय चाहत्यांमध्ये जी उत्सुकता होती, ती निम्मी पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर संपली. थोडीफार आशा शिल्लक होती, मात्र त्यावर अफगाणिस्तानच्या स्कॉटलंडवर मोठ्या विजयानंतर काळे ढग घिरट्या घालताना दिसू लागले आहेत.

T20 World Cup 2021: भारताचा सेमीफायनलचा मार्ग खडतर, पाकिस्तान-अफगाणिस्तानकडून कोंडी
भारतीय क्रिकेट संघ
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 26, 2021 | 12:54 PM
Share

मुंबई : टी-20 विश्वचषकाबद्दल भारतीय चाहत्यांमध्ये जी उत्सुकता होती, ती निम्मी पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर संपली. थोडीफार आशा शिल्लक होती, मात्र त्यावर अफगाणिस्तानच्या स्कॉटलंडवर मोठ्या विजयानंतर काळे ढग घिरट्या घालताना दिसू लागले आहेत. अफगाणिस्तानने स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या सामन्यात स्कॉटलंडचा 130 धावांनी पराभव केला. इतक्या मोठ्या फरकाने मिळवलेल्या विजयानंतर टीम इंडियाच्या पुढे जाण्याच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या आहेत. टीम इंडियाला उपांत्य फेरीपूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. कारण जेव्हा सेमीफायनलचं तिकीट नेट रनरेटवर अवलंबून असेल तेव्हा भारताचा मार्ग खडतर बनेल. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची जी अवस्था झाली होती, अगदी तशीच अवस्था टीम इंडियाची होऊ शकते. (T20 World Cup 2021 : team India Way to semifinal gets difficult after Pakistan And Afghanistan biig victory)

टी-20 विश्वचषक स्पर्धेत सोमवारी (25 ऑक्टोबर) अफगाणिस्तान संघाने स्कॉटलंडवर 130 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह सुपर 12 च्या ग्रुप 2 मध्ये अफगाणिस्तान अव्वल स्थानी पोहचला आहे. टी20 क्रिकेटच्या इतिहासात अफगाणिस्तान संघाचा सर्वात मोठा विजय असणाऱ्या या विजयात गोलंदाज मुजीब उर रेहमान आणि राशिद खान यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. आधी फलंदाजीवेळी 190 धावा केल्यानंतर गोलंदाजीवेळी अफगाणिस्तानने स्कॉटलंडला अवघ्या 60 धावांत सर्वबाद केलं.

नेट रनरेटच्या गणितात भारत अडकला

अफगाणिस्तानने या विजयासह भारत असलेल्या ग्रुप 2 मध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दोघांनी एक एक विजय मिळवला असला तरी अफगाणिस्तानचा नेट रन रेट या मोठ्या विजयामुळे तब्बल +6.500 इतका झाला आहे. त्यात भारत एक सामना पराभूत झाला आहे. ज्यामुळे भविष्यात पुढील फेरीत जाण्याची संधी येईल तेव्हा अफगाणिस्तानच्या नेट रनरेटला तोड देण्यासाठी भारताला मोठ्या विजयांची गरज आहे. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानने भारतावर 10 गडी आणि 13 चेंडू राखून मात केली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा नेट रनरेट +0.973 इतका आहे. त्यामुळे पाकिस्तान गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे, तर भारताचा रननेट -0.973 इतका आहे, त्यामुळे भारत आपल्या ग्रुपमध्ये खालून दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आज पाकिस्तानच्या विजयाची अपेक्षा करावी लागणार

सुपर 12 मध्ये दोन्ही गटातील प्रत्येकी दोन संघांना उपांत्य फेरीत जायचे आहे. भारताला पुढील सामना 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. पण, त्यात जिंकण्यासाठी रणनीती बनवण्याआधी आज पाकिस्तानने न्यूझीलंडला हरवण्याची अपेक्षा करावी लागेल. कारण न्यूझीलंड जिंकला तर अडचणी आणखी वाढू शकतात. जर पाकिस्तानने आज न्यूझीलंडला हरवले आणि त्यानंतर 31 ऑक्टोबरला भारताने किवी संघावर मोठा विजय नोंदवला तर परिस्थिती थोडी सुधारू शकते. पण, ही आशा पूर्ण न झाल्यास भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतो.

इतर बातम्या

India vs Pakistan : भारतावर विजयानंतर बाबर आजमनं संघाला दिला मोलाचा संदेश, म्हणतो ‘अतिउत्साही होऊ नका, अजून स्पर्धा बाकी आहे’

India vs Pakistan : भारताच्या पराभवानंतर विनोद कांबळी वैतागला, हार्दीकला म्हणतो जाऊन दांडीया खेळ

India vs Pakistan : वरुण चक्रवर्तीसारखे बोलर तर पाकिस्तानच्या गल्ल्यांमध्येपण मिळतील, माजी पाक कर्णधाराचा हल्लाबोल

(T20 World Cup 2021 : team India Way to semifinal gets difficult after Pakistan And Afghanistan biig victory)

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’.

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी