AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: पराभवानंतर रोहित शर्माच्या अश्रुंचा बांध फुटला, पहा VIDEO

IND vs ENG: त्यावेळी राहुल द्रविड शेजारी जाऊन बसले, आणि....

IND vs ENG: पराभवानंतर रोहित शर्माच्या अश्रुंचा बांध फुटला, पहा VIDEO
Rohit sharmaImage Credit source: Twitter
| Updated on: Nov 10, 2022 | 6:38 PM
Share

एडिलेड: T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये टीम इंडियाचा प्रवास एका लज्जास्पद पराभवाने संपला. एडिलेडमध्ये सेमीफायनलचा सामना झाला. या मॅचमध्ये इंग्लंडने भारतावर 10 विकेटने विजय मिळवला. या पराभवामुळे टीम इंडियाची टी 20 वर्ल्ड कप विजेतेपदाची 15 वर्षापासूनची प्रतिक्षा संपलेली नाही. भारताला 2007 पासून टी 20 वर्ल्ड कपच विजेतेपद मिळवता आलेलं नाही.

या पराभवामुळे फॅन्सबरोबर रोहित शर्माही खूप निराश झाला. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये रोहित शर्माची बॅट विशेष चालली नाही.

राहुल द्रविड शेजारी जाऊन बसले, आणि….

रोहित शर्माला पराभवानंतर स्वत:ला सावरण खूपच कठीण गेलं. तो डगआऊटमध्ये जाऊन एकटा बसला होता. कोणाशी काही बोलला नाही. खूप निराश झाला होता. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. त्यावेळी राहुल द्रविड त्याच्या शेजारी येऊन बसले. त्याच्याशी बोलले व त्याला संभाळण्याचा प्रयत्न केला. पण रोहितकडे पाहून तो स्वत:ला सावरण्याच्या स्थितीत वाटला नाही.

रोहित शर्मा काय म्हणाला?

“मी खूप निराश आहे. आम्ही खूप मेहनतीने स्कोर उभा केला. आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही. नॉकआऊटच प्रेशर तुम्ही कसं संभाळता, त्यावर बरच काही अवलंबून असतं. शांत राहण्याची गरज होती. आम्ही सुरुवातीलाच घाबरत होतो. इंग्लंडच्या ओपनर्सना श्रेय द्याव लागेल” असं रोहित म्हणाला.

टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्याकडून कोट्यवधी चाहत्यांना भरपूर अपेक्षा होत्या. पण नेहमी होतं, तसच घडलं. सेमीफायनल मॅचमध्ये टीम इंडियाचा अत्यंत दारुण पराभव झाला. इंग्लंडच्या टीमने मोठा विजय मिळवून दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. आता रविवारी मेलबर्नवर इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये फायनल खेळली जाईल.

Follow Us
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.