T20 WC 2026: भारताविरुद्ध लढण्यापूर्वी नेदरलँडचा पाकिस्तानला दणका, गुणतालिकेत उलथापालथ

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या गुणतालिकेत प्रत्येक सामन्यानंतर उलथापालथ होत आहे. या स्पर्धेच्या चौथ्या दिवशी नेदरलँड आणि नामिबिया हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील निकाल पाकिस्तानसाठी धाकधूक वाढवणारा ठरला आहे. नेमकं काय झालं ते समजून घ्या.

T20 WC 2026: भारताविरुद्ध लढण्यापूर्वी नेदरलँडचा पाकिस्तानला दणका, गुणतालिकेत उलथापालथ
भारताविरुद्ध लढण्यापूर्वी नेदरलँडचा पाकिस्तानला दणका, गुणतालिकेत उलथापालथ
Image Credit source: Icc X account
| Updated on: Feb 10, 2026 | 4:24 PM

NED vs NAM, T20 World Cup 2026: टी20 स्पर्धेत एकूण 20 संघात चार गट पाडले असून प्रत्येक गटात 5 संघ आहे. या पाच पैकी दोन संघांना सुपर 8 फेरीत जागा मिळणार आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत एकूण चार सामने खेळणार असून चुरस निर्माण झाली आहे. भारत, नेदरलँड, पाकिस्तान, नामिबिया आणि अमेरिका हे संघ एका गटात आहे. या पाच संघात टॉप 2 मध्ये जागा मिळवण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. असं असताना या स्पर्धेच्या चौथ्या दिवशी नामिबिया आणि नेदरलँड यांच्यात सामना पडला. या सामन्याच्या निकालाचा गुणतालिकेवर परिणाम दिसून आला आहे. नामबियाने नेदरलँडला विजयासाठी 20 षटकात 8 गडी गमवून 156 दिल्या होत्या. हे आव्हान नेदरलँडने 18 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. नेदरलँडने 7 गडी आणि 2 षटकं राखून हा विजय मिळवला. त्यामुळे नेदरलँडला जबरदस्त फायदा झाला आहे. तर पाकिस्तानला फटका बसला आहे.

नेदरलँडला या विजयासाठी 2 गुण मिळाले आहेत. या स्पर्धेतील नेदरलँडचा हा पहिला विजय आहे. यापूर्वी पाकिस्तानकडून निसटता पराभव झाला होता. पण या सामन्यानंतर पाकिस्तानपेक्षा वरचढ ठरला आहे. कारण पाकिस्तानचे भले दोन गुण असले तरी नेट रनरेटच्या बाबतीत नेदरलँडचा संघ पुढे आहे. नेदरलँडचे 2 गुण आणि नेट रनरेटच हा +0.356 आहे. तर पाकिस्तानचे 2 गुण आणि नेट रनरेट हा +0.240 आहे. या गटात भारतीय संघ टॉपला असून 2 गुण आणि नेट रनरेट हा +1.450 आहे. पाकिस्तान आणि अमेरिका सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होणार हे निश्चित आहे. त्यामुळे या सामन्याकडे लक्ष असणार आहे.

भारताचा दुसरा सामना नामिबियाशी 12 फेब्रुवारीला होणार आहे. हा सामना दिल्ली येथे होणार आहे. या सामन्यातील विजय भारताचं सुपर 8 फेरीचं गणित आणखी सुलभ करेल. भारताने या सामन्यात नुसता विजय नाही तर नेट रनरेट आणखी जबरदस्त करण्याची गरज आहे. तर 15 फेब्रुवारी भारत पाकिस्तान यांच्यात लढत होईल. हा सामना खऱ्या अर्थाने सुपर 8 फेरीचं गणित सोडवणार आहे. कारण या सामन्यातील विजयी संघाल थेट सुपर 8 फेरीत जागा मिळेल. त्यामुळे या सामन्याची रंगत आणखी वाढणार आहे.