
भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयाने सुरुवात केली. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात यूएसएचा पराभव करत विजयाचं खातं उघडलं. मात्र यूएसएने भारताला हा सामना सहजासहजी जिंकू दिला नाही. भारताला हा सामना जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागला. मात्र सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने हा सामना सुरक्षित अंतराने जिंकला. भारताने यासह टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत सलग सर्वाधिक सामने जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही ब्रेक केला. आता टीम इंडिया या मोहिमेतील आपला दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे.
टीम इंडिया आपला दुसरा सामना हा नवख्या नामिबिया विरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघांचा हा दुसरा असणार आहे. हा सामना 12 फेब्रुवारीला नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. भारताची या सामन्यानिमित्ताने अरुण जेटली स्टेडियममध्ये कामगिरी कशी राहिली आहे, हे जाणून घेऊयात.
टीम इंडियाने गेल्या टी 20I वर्ल्ड कपनंतर सातत्याने चमकदार कामगिरी केलीय. त्यामुळे भारताचं एकतर्फी वर्चस्व राहिलं आहे. तसेच भारताची दिल्लीतील या स्टेडियममधील कामगिरी समाधानकारक आहे. मात्र भारताची ती आकडेवारी सुधारण्याचा प्रयत्न असणार आहे.भारताने या मैदानात आतापर्यंत 4 टी 20I सामने खेळले आहेत. भारताने त्यापैकी 2 सामने जिंकलेत. तर 2 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय.
त्यामुळे आता टीम इंडिया 12 फेब्रुवारीला या मैदानातील आपल्या एकूण पाचव्या टी 20I सामन्यात खेळताना तिसरा विजय मिळवणार याची खात्री चाहत्यांना आहे. त्यामुळे या सामन्याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.