AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेट विश्वात खळबळ, आशिया कपआधी स्टार खेळाडूने कर्णधारपद सोडण्याचा घेतला मोठा निर्णय!

येत्या 30 ऑगस्टपासून 14 व्या आशिया कप स्पर्धेला सुरूवात होत आहे. टीम इंडियाचे आशिया कपमधील सर्व सामने श्राीलंकेमध्ये होणार आहेत. या स्पर्धेला अवघ्या एक महिन्याचा कालावधी बाकी असताना स्टार खेळाडूने कर्णधारपदावरून पायउतार घेण्याचा मोठा विक्रम घेतला आहे.

क्रिकेट विश्वात खळबळ, आशिया कपआधी स्टार खेळाडूने कर्णधारपद सोडण्याचा घेतला मोठा निर्णय!
| Updated on: Aug 04, 2023 | 10:57 AM
Share

मुंबई :  क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आशिया कप तोंडावर असताना कर्णधारपद सोडून आशिया कप स्पर्धेमधून बाहेर पडण्याचा निर्णय कर्णधाराने घेतला आहे. येत्या 30 ऑगस्टपासून 14 व्या आशिया कप स्पर्धेला सुरूवात होत आहे. टीम इंडियाचे आशिया कपमधील सर्व सामने श्राीलंकेमध्ये होणार आहेत. या स्पर्धेला अवघ्या एक महिन्याचा कालावधी बाकी असताना स्टार खेळाडूने कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची क्रीडा वर्तुळात जोरदार चर्चा होत असलेली पाहायला मिळत आहे.

कोण आहे ‘तो’ स्टार खेळाडू?

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार तमीम इक्बाल आहे. तमिम इक्बालने आता काही दिवसांपुर्वी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र बांगलादेशच्या राष्ट्ट्रपती शेख हसीना यांनी तमिमला निवृत्तीचा निर्णय मागे घ्यायला लावला होता. आता परत एकदा त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तमिम इक्बाल याच्या या निर्णयाची क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

तमिम इक्बाल याने पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती घेतली. डावखुरा फलंदाज असलेल्या तमिमने येत्या वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. व्यस्त शेड्यूलमुळे ताण येऊ नये म्हणून त्याने सावधानता म्हणून हा निर्णय घेतल्याची माहिती समजत आहे.

वर्ल्ड कपआधी बांगलादेश संघाची न्यूझीलंडविरूद्ध वन डे सामन्यांची मालिक आहे. तमिमने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की, एक कर्णधार म्हणून मला स्वत:वर लक्ष केंद्रित करायचं आहे. वर्ल्ड कपवेळी संधी मिळेल तेव्हा मला सर्वोत्तम कामगिरी करायची आहे.

दरम्यान, तमिम इक्बाल याने बांगलादेशकडून 70 कसोटी सामने, 241 वन डे आणि 78 टी-20 सामने खेळले पाहिजेत. यामधील कसोटीमध्ये 5134, वन डेमध्ये 8313 तर टी-20 मध्ये 1758 धावा केल्या आहेत. यामधील कसोटीत 10 शतके, वन डे मध्ये 14 शतके आणि 56 अर्धशतके आणि टी-20 मध्ये 1 शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.

महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.