AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेट विश्वात खळबळ, आशिया कपआधी स्टार खेळाडूने कर्णधारपद सोडण्याचा घेतला मोठा निर्णय!

येत्या 30 ऑगस्टपासून 14 व्या आशिया कप स्पर्धेला सुरूवात होत आहे. टीम इंडियाचे आशिया कपमधील सर्व सामने श्राीलंकेमध्ये होणार आहेत. या स्पर्धेला अवघ्या एक महिन्याचा कालावधी बाकी असताना स्टार खेळाडूने कर्णधारपदावरून पायउतार घेण्याचा मोठा विक्रम घेतला आहे.

क्रिकेट विश्वात खळबळ, आशिया कपआधी स्टार खेळाडूने कर्णधारपद सोडण्याचा घेतला मोठा निर्णय!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 04, 2023 | 10:57 AM
Share

मुंबई :  क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आशिया कप तोंडावर असताना कर्णधारपद सोडून आशिया कप स्पर्धेमधून बाहेर पडण्याचा निर्णय कर्णधाराने घेतला आहे. येत्या 30 ऑगस्टपासून 14 व्या आशिया कप स्पर्धेला सुरूवात होत आहे. टीम इंडियाचे आशिया कपमधील सर्व सामने श्राीलंकेमध्ये होणार आहेत. या स्पर्धेला अवघ्या एक महिन्याचा कालावधी बाकी असताना स्टार खेळाडूने कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची क्रीडा वर्तुळात जोरदार चर्चा होत असलेली पाहायला मिळत आहे.

कोण आहे ‘तो’ स्टार खेळाडू?

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार तमीम इक्बाल आहे. तमिम इक्बालने आता काही दिवसांपुर्वी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र बांगलादेशच्या राष्ट्ट्रपती शेख हसीना यांनी तमिमला निवृत्तीचा निर्णय मागे घ्यायला लावला होता. आता परत एकदा त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तमिम इक्बाल याच्या या निर्णयाची क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

तमिम इक्बाल याने पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती घेतली. डावखुरा फलंदाज असलेल्या तमिमने येत्या वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. व्यस्त शेड्यूलमुळे ताण येऊ नये म्हणून त्याने सावधानता म्हणून हा निर्णय घेतल्याची माहिती समजत आहे.

वर्ल्ड कपआधी बांगलादेश संघाची न्यूझीलंडविरूद्ध वन डे सामन्यांची मालिक आहे. तमिमने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की, एक कर्णधार म्हणून मला स्वत:वर लक्ष केंद्रित करायचं आहे. वर्ल्ड कपवेळी संधी मिळेल तेव्हा मला सर्वोत्तम कामगिरी करायची आहे.

दरम्यान, तमिम इक्बाल याने बांगलादेशकडून 70 कसोटी सामने, 241 वन डे आणि 78 टी-20 सामने खेळले पाहिजेत. यामधील कसोटीमध्ये 5134, वन डेमध्ये 8313 तर टी-20 मध्ये 1758 धावा केल्या आहेत. यामधील कसोटीत 10 शतके, वन डे मध्ये 14 शतके आणि 56 अर्धशतके आणि टी-20 मध्ये 1 शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.

Follow Us
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.