AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ind vs wi T-20 | टीम इंडियाच्या पराभवाबाबत बोलताना पंड्याने ‘या’ खेळाडूंना ठरवलं जबाबदार

Hardik Pandya on Ind vs wi : सामन्यानंतर बोलताना हार्दिक पंड्याने पराभवाचं खापर काही खेळाडूंवर फोडलं आहे. यावेळी बोलताना पंड्याने नेमका सामना कुठे गमावला हेसुद्धा सांगितलं आहे. या पराभवामुळे हार्दिक पंड्या संतापलेला दिसला.

ind vs wi T-20 | टीम इंडियाच्या पराभवाबाबत बोलताना पंड्याने ‘या’ खेळाडूंना ठरवलं जबाबदार
| Updated on: Aug 04, 2023 | 9:38 AM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमधील झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात 4 धावांनी टीम इंडियाचा पराभव झाला आहे. युवा खेळाडूंना घेऊन मैदानात उतरलेल्या हार्दिक पंड्याला पहिल्याच सामन्यात अपयश आलं आहे. सामन्यानंतर बोलताना हार्दिक पंड्याने पराभवाचं खापर काही खेळाडूंवर फोडलं आहे. यावेळी बोलताना पंड्याने नेमका सामना कुठे गमावला हेसुद्धा सांगितलं आहे. या पराभवामुळे हार्दिक पंड्या संतापलेला दिसला.

काय म्हणाला हार्दिक पंड्या?

वेस्ट इंडिज संघाने दिलेल्या लक्ष्याचा आम्ही व्यवस्थित पाठलाग करत होतो. पण सामना मध्यावर गेला असताना आम्ही काही चुका केल्या आणि त्याचाच आम्हाला फटका बसला. मला वाटतं की, टी-20 क्रिकेटमध्ये तुम्ही सलग विकेट गमावल्या तर टार्गेटचा पाठलाग करणं कठीण होऊन जातं आणि तिच चूक आमच्याकडून झाली. सलग दोन विकेट गमावल्याने आम्हाला त्याचा मोठा फटका बसला आणि सामना गमवावा लागला असल्याचं हार्दिक पंड्याने सांगितलं

…म्हणून तिन्ही स्पिनर्सला का खेळवलं!

कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांना खेळवण्याचा निर्णय घेतला होता. यावर बोलताना, दोन स्पिनर्स आणि अक्षर पटेल याला स्पिनर आणि फलंदाज म्हणून संघात ठेवलं. जेणेकरून संघ संतुलित झाल्याचं हार्दिकने सांगितलं. त्यासोबतच पदार्पणवीर तिलव वर्मा आणि मुकेश कुमार यांनी दमदार कामगिरी केली असल्याचंही पंड्या म्हणाला.

सामन्याचा धावता आढावा

वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना 149-6 धावा केल्या होत्या. यामध्ये निकोलस पूरन 41 धावा आणि रोवमॅन पावेल 48 धावा दोघांनी महत्त्वाची खेळी केली. अर्शदीप सिंग आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंंडियाला 20 षटकांमध्ये  145 धावा करता आल्या. टीम इंडियाकडून तिलक वर्मा सोडता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या गाठता आली नाही. पाच सामन्यांच्या मालिकेत आता वेस्ट इंडिज संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | रोवमॅन पावेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉनसन चार्ल्स (विकेटकीपर), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसैन, अल्जारी जोसेफ आणि ओबेड मॅकॉय

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....