AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी नव्या जर्सीचं अनावरण, रोहित शर्मा स्पष्टच म्हणाला की…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी अवघ्या दोन महिन्यांचा अवधी शिल्लक राहीला आहे. 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना 8 मार्चला होणार आहे. या स्पर्धेचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. आता टीम इंडियाच्या जर्सीचं अनावरण करण्यात आलं आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी नव्या जर्सीचं अनावरण, रोहित शर्मा स्पष्टच म्हणाला की...
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी नव्या जर्सीचं अनावरण, रोहित शर्मा स्पष्टच म्हणाला की...Image Credit source: Daniel Pockett-ICC/ICC via Getty Images
| Updated on: Dec 03, 2025 | 6:04 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंका या देशाकडे आहेत. या स्पर्धेत पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंकेत होणार आहेत. या स्पर्धेत एकूण 20 संघ भाग घेणार असून त्या स्पर्धेचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. या स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना 8 मार्चला होणार आहे. पाच संघांचा एक गट तयार केला असून एकूण चार गट तयार केले आहेत. अ गटात भारत, पाकिस्तान, नेदरलँड्स, नामिबिया, अमेरिका हे संघ आहेत. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे साखळी फेरीत दोन्ही संघ भिडणार यात काही शंका नाही. असं असताना या स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या जर्सीचं अनावरण करण्यात आलं आहे. भारत दक्षिण अफ्रिका वनडे सामन्यातील पहिला डाव संपल्यानंतर जर्सीचं अनावरण करण्यात आलं.

भारताच्या जर्सीवर 2 स्टार का?

टीम इंडियाच्या टी20 वर्ल्डकप 2026 च्या जर्सीची कॉलर तिरंगी रंगात आहे. पुढच्या बाजूला गडद निळ्या रंगाचे पट्टे असतील. देशाचं नाव भगव्या रंगात मध्यभागी आहे. तर हातांच्या खाली भगवा पट्टा आहे. तर खांद्यावर पांढरे तीन आडवे पट्टे दिले आहेत. समोरील बाजूस हलके आणि गडद निळे पट्टे स्पष्टपणे दिसतात. टीम इंडियाच्या जर्सीवर 2 स्टार आहे. हे स्टार भारताने दोनदा टी20 वर्ल्डकप जिंकल्याचं प्रतिनिधित्व करतात. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या हस्ते या जर्सीचं अनावरण करण्यात आलं. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये उपस्थितीत अनावरण करण्यात आलं.

काय म्हणाला रोहित शर्मा?

जर्सीचं अनावरण करताना रोहित शर्मा म्हणाला की, “हा एक लांब प्रवास होता. आम्ही 2007 मध्ये पहिला वर्ल्डकप जिंकला आणि पुढचा वर्ल्डकप जिंकण्यासाठी आम्हाला 15 वर्षांहून अधिक काळ वाट पाहावी लागली. हा एक लांब प्रवास होता आणि यात अनेक चढ-उतार होते. पण पुन्हा ट्रॉफी उचलणे खूप छान वाटले. आता, भारतात विश्वचषक होत असल्याने ही एक रोमांचक स्पर्धा असणार आहे. माझ्या शुभेच्छा नेहमीच संघासोबत आहेत आणि मला खात्री आहे की प्रत्येकजण त्यांच्या मागे असेल. त्यांना पाठिंबा देईल आणि संघ त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न करेल.”

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार