IND vs SL: कोलंबोत श्रीलंकन संघाला मिळणार क्लिन स्विप! कसं काय? 15 वर्षांचा रेकॉर्ड एकदा वाचा

श्रीलंकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना कोलंबोत होणार आहे. हा सामना जिंकून श्रीलंकेला क्लिन स्विप देण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. खरं तर गॉल कसोटी सामना जिंकणं सोपं नव्हतं. पण भारतीय संघाने करून दाखवलं. आता कोलंबो कसोटी जिंकणं सोपं असल्याचं दिसत आहे.

IND vs SL: कोलंबोत श्रीलंकन संघाला मिळणार क्लिन स्विप! कसं काय? 15 वर्षांचा रेकॉर्ड एकदा वाचा
IND vs SL: कोलंबोत श्रीलंकन संघाला मिळणार क्लिन स्विप! कसं काय? 15 वर्षांचा रेकॉर्ड एकदा वाचा
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 20, 2026 | 5:54 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियासाठी प्रत्येक कसोटी सामना करो या मरोची लढाई आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही विजय मिळवणं भाग आहे. गॉल कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला फिरकीच्या जोरावर नमवलं. तसेच देवदत्त पडिक्कलच्या खेळीमुळे संघाला मोठी साथ मिळाली. हा सामना भारताने 165 धावांनी जिंकला. तसेच दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता भारताकडे कसोटी मालिकेत श्रीलंकेला क्लिन स्विप देण्याची मोठी संधी आहे. हा कसोटी सामना कोलंबोत होत असल्याने भारतीय संघाच्या आशा वाढल्या आहेत. कारण मागच्या 15 वर्षात भारतीय संघाने या मैदानात एकही सामना गमावलेला नाही.

कोलंबोच्या एसएससीमध्ये भारताची कामगिरी कशी?

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारत आणि श्रीलंका हे दोन संघ सिंहली स्पोर्ट्स क्लबमध्ये 23 ऑगस्टला भिडणार आहेत. या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना असल्याने दोन्ही संघ जोर लावणार यात काही शंका नाही. हा सामना ड्रॉ किंवा भारताने जिंकला तर मालिका खिशात घालेल. पण श्रीलंकेने जिंकला तर मालिका बरोबरीत सुटेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने दोन्ही संघाला या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे. भारतीय संघाने गॉल कसोटी सामन्यात विजय मिळवल्याने आशा वाढल्या आहेत. कोलंबोत विजयी पताका फडकवण्याचा मानस टीम इंडियाचा असणार आहे. त्यात सिंहली स्पोर्ट्स क्लब मैदानात भारताची कामगिरी जबरदस्त आहे. 2010 पासून आतापर्यंत भारताने एकही कसोटी सामना गमावलेला नाही.

2010 पासून आतापर्यंत भारत आणि श्रीलंका यांच्यात या मैदानावर तीन कसोटी सामने पार पडले. यात पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. तर उर्वरित दोन सामन्यात भारातने मोठ्या फरकाने विजय मिळवला. भारताला या मैदानात शेवटचा पराभव 2008 मध्ये सहन करावा लागला होता. या मैदानात भारत आणि श्रीलंका यांच्यात एकूण 9 कसोटी सामने खेळले गेलेत. त्यात 3 सामने भारताने, तर 2 सामने श्रीलंकेने जिंकले आहेत. तर चार सामने ड्रॉ झाले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us