AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: कोलंबोत श्रीलंकन संघाला मिळणार क्लिन स्विप! कसं काय? 15 वर्षांचा रेकॉर्ड एकदा वाचा

श्रीलंकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना कोलंबोत होणार आहे. हा सामना जिंकून श्रीलंकेला क्लिन स्विप देण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. खरं तर गॉल कसोटी सामना जिंकणं सोपं नव्हतं. पण भारतीय संघाने करून दाखवलं. आता कोलंबो कसोटी जिंकणं सोपं असल्याचं दिसत आहे.

IND vs SL: कोलंबोत श्रीलंकन संघाला मिळणार क्लिन स्विप! कसं काय? 15 वर्षांचा रेकॉर्ड एकदा वाचा
IND vs SL: कोलंबोत श्रीलंकन संघाला मिळणार क्लिन स्विप! कसं काय? 15 वर्षांचा रेकॉर्ड एकदा वाचाImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 20, 2026 | 5:54 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियासाठी प्रत्येक कसोटी सामना करो या मरोची लढाई आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही विजय मिळवणं भाग आहे. गॉल कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला फिरकीच्या जोरावर नमवलं. तसेच देवदत्त पडिक्कलच्या खेळीमुळे संघाला मोठी साथ मिळाली. हा सामना भारताने 165 धावांनी जिंकला. तसेच दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता भारताकडे कसोटी मालिकेत श्रीलंकेला क्लिन स्विप देण्याची मोठी संधी आहे. हा कसोटी सामना कोलंबोत होत असल्याने भारतीय संघाच्या आशा वाढल्या आहेत. कारण मागच्या 15 वर्षात भारतीय संघाने या मैदानात एकही सामना गमावलेला नाही.

कोलंबोच्या एसएससीमध्ये भारताची कामगिरी कशी?

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारत आणि श्रीलंका हे दोन संघ सिंहली स्पोर्ट्स क्लबमध्ये 23 ऑगस्टला भिडणार आहेत. या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना असल्याने दोन्ही संघ जोर लावणार यात काही शंका नाही. हा सामना ड्रॉ किंवा भारताने जिंकला तर मालिका खिशात घालेल. पण श्रीलंकेने जिंकला तर मालिका बरोबरीत सुटेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने दोन्ही संघाला या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे. भारतीय संघाने गॉल कसोटी सामन्यात विजय मिळवल्याने आशा वाढल्या आहेत. कोलंबोत विजयी पताका फडकवण्याचा मानस टीम इंडियाचा असणार आहे. त्यात सिंहली स्पोर्ट्स क्लब मैदानात भारताची कामगिरी जबरदस्त आहे. 2010 पासून आतापर्यंत भारताने एकही कसोटी सामना गमावलेला नाही.

2010 पासून आतापर्यंत भारत आणि श्रीलंका यांच्यात या मैदानावर तीन कसोटी सामने पार पडले. यात पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. तर उर्वरित दोन सामन्यात भारातने मोठ्या फरकाने विजय मिळवला. भारताला या मैदानात शेवटचा पराभव 2008 मध्ये सहन करावा लागला होता. या मैदानात भारत आणि श्रीलंका यांच्यात एकूण 9 कसोटी सामने खेळले गेलेत. त्यात 3 सामने भारताने, तर 2 सामने श्रीलंकेने जिंकले आहेत. तर चार सामने ड्रॉ झाले आहेत.

Follow Us
पोलिस संरक्षण काढून ये मग... फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर,
Video : पोलिस संरक्षण काढून ये मग...  फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कोर्टात काय...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेच्या वकीलांची मोठी मागणी
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टाकडे मोठी मागणी
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अंबाझरी तलावाची पाहणी, नागपूरच्या वैभवाल
अंबाझरी तलावाचे पुनरुज्जीवन, पर्यटन आणि जलक्रीडा केंद्र म्हणून विकासाची फडणवीस यांची घोषणा
मराठा आरक्षणासाठी दातेंच्या उपोषणाची धार कायम
मराठा आरक्षणासाठी राजेंद्र दातेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस
मनसे विद्यार्थ्यांच्या पाठीशी
अमित ठाकरे यांचा सडेतोड इशारा; मुलींना हात लावाल तर मार खाणारच
आमच्याकडे अधिकार आहेत यात... कोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी, नेमकं...
आमच्याकडे अपात्र करण्याचे अधिकार आहेत, यामध्ये... कोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी, नेमकं निरिक्षण काय?
मुंबईत ऑटो, टॅक्सी चालकांसाठी आरटीओची मराठी भाषा तपासणी मोहीम
मुंबईत आरटीओची कारवाई: ऑटो, टॅक्सी चालकांना मराठी भाषेची सक्ती
दादरमध्ये अमराठी टॅक्सी चालकांची पोलिसांकडून तपासणी, दंडवसुलीमुळे...
दादरमध्ये अमराठी टॅक्सी चालकांची पोलिसांकडून तपासणी, दंडवसुलीमुळे चालकांमध्ये संताप