LSG vs KKR सामन्यात मोठी चूक! सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे उडाला गोंधळ, 12व्या षटकात काय झालं?

आयपीएल 2026 स्पर्धेतील 38वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात एक निर्णयाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. पंचांच्या निर्णय चुकल्याचं सोशल मीडियावर बोललं जात आहे.

LSG vs KKR सामन्यात मोठी चूक! सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे उडाला गोंधळ, 12व्या षटकात काय झालं?
LSG vs KKR सामन्यात मोठी चूक! सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे उडाला गोंधळ, 12व्या षटकात काय झालं?
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 27, 2026 | 3:41 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपर जायंट्ससमोवर 155 धावा केल्या आणि विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं. पण लखनौचा संघ 155 धावा करू शकला त्यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये सुनील नरीनने तीन चेंडूतच लखनौचा गेम संपवला. पहिल्या चेंडूवर निकोलस पूरनला त्रिफळाचीत केलं. तर दुसऱ्या चेंडूवर ऋषभ पंतने एक धाव काढली आणि एडन मार्करम स्ट्राईक दिली. पण त्याची विकेट तिसऱ्या चेंडूवर गेली. त्यामुळे विजयासाठी फक्त दोन धावा आल्या. कोलकात्याकडून रिंकु सिंह मैदानात उतरला आणि पहिल्याच चेंडूवर चौकार मारला आणि जिंकले. पण या सामन्याचा निकाल हा सुपर ओव्हरमध्ये जाण्याची गरजच नव्हती, असा वाद सोशल मीडियावर सुरू आहे. हा सामना लखनौ सुपर जायंट्सने जिंकला होता. पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसल्याचं सांगितलं जात आहे.

सोशल मीडियावरील दाव्यानुसार, 12व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने षटकार मारला होता. पण पंचांनी निर्णय देताना चूक केली असा दावा केला जात आहे. कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने मोठा फटका मारला होता. हा चेंडू थेट सीमेपार गेला. म्हणजेच षटकार गेल्याचा दावा केला जात आहे. पण पंचांनी षटकाराऐवजी चौकार दिला. त्यामुळे धावांची मोजणी करणाऱ्याने चौकार मोजला. तर व्हिडीओत ग्राफिक्सच्या माध्यमातून षटकाराची लांबी 63 मीटर दाखवली गेली. त्यामुळे सोशल मीडियावर षटकाराऐवजी चौकार दिल्याने लखनौचं नुकसान झालं.

पंचांच्या या निर्णयामुळे लखनौ सुपर जायंट्सचं 2 धावांचं नुकसान झालं. त्याची किंमत लखनौला पराभवातून मोजावी लागली. जर तसं झालं नसतं तर हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेलाच नसता आणि लखनौने हा सामना जिंकला असता असा दावा केला जात आहे. त्यामुळे आता नेमकं काय घडलं आणि कोणाची यावरून सोशल मिडियात वाद प्रतिवाद सुरू आहे. दरम्यान, एका विशिष्ट कोनातून पाहिल्यास चेंडू न उसळता सीमारेषा ओलांडल्यासारखा दिसला. पण इतर कॅमेरा अँगलमधून दोरीच्या अगदी आधी उसळल्याचे स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे षटकाराऐवजी चौकार देण्याचा पंचांचा निर्णय योग्य होता.

Follow Us