AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 IND vs SA : टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज, दक्षिण आफ्रिकेसाठी करो या मरो, कोण जिंकणार?

India U19 vs South Africa U19 2nd One Day : अंडर 19 टीम इंडियाने वैभव सूर्यवंशी याच्या नेतृत्वातील पहिल्याच सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे आता भारताला दुसरा सामना जिंकून मालिकेवर नाव कोरण्याची संधी आहे. तर दक्षिण आफ्रिकेसमोर भारताला विजयापासून रोखण्याचं आव्हान आहे.

U19 IND vs SA : टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज, दक्षिण आफ्रिकेसाठी करो या मरो, कोण जिंकणार?
Vaibhav Suryavanshi U19 Team IndiaImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Jan 05, 2026 | 2:20 AM
Share

वैभव सूर्यवंशी याच्या नेतृत्वात अंडर 19 टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौऱ्याची आणि नववर्षाची सुरुवात विजयाने केली. भारताने यूथ वनडे सीरिजमधील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर डीएलसनुसार 25 धावांनी मात केली. भारताने यासह 3 सामन्यांच्या मलिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे आता टीम इंडियाला सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला यजमान दक्षिण आफ्रिकेला मालिकेतील आव्हान कायम ठेवायचं असेल तर दुसर्‍या सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसाठी हा करो या मरो असा सामना आहे. या सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

दुसरा सामना कुठे?

उभयसंघातील दुसरा सामना हा सोमवारी 5 जानेवारीला विलोमूर पार्क बेनोनी इथे होणार आहे. सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 1 वाजता नाणेफेकीचा कौल लागणार आहे. भारतीय संघाचा हा सामना जिंकून मालिका नावावर करण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच विजयी सुरुवात केल्याने भारताला तिसऱ्या सामन्यातही मालिका जिंकण्याची संधी आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेसाठी ही शेवटची संधी आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात पूर्ण ताकदीने उतरावं लागणार आहे.

भारताचा डीएलएसनुसार विजय

उभयसंघातील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे पूर्ण झाला नाही. सामन्याचा निकाल हा डीएसनुसार लावण्यात आला.भारताने या सामन्यात 50 ओव्हरमध्ये ऑलआऊट 301 रन्स केल्या. प्रत्त्युतरात दक्षिण आफ्रिकेने 27.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 148 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे सामना बरोबरीत सुरु होता. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवण्यात आला. त्यानंतर सामना पुन्हा सुरु झालाच नाही. भारताने अशाप्रकारे हा सामना डीएलनुसार 25 धावांनी जिंकला. पावसामुळे दक्षिण आफ्रिलेला सामना जिंकण्यासाठी पूर्ण संधी मिळालीच नाही

वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष

दरम्यान दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे. नियमित कर्णधार आयुष म्हात्रे याला दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकावं लागलं आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशी याला नेतृत्वाची धुरा देण्यात आलीय. भारताने वैभवच्या नेतृत्वात विजयी सलामी दिली. मात्र वैभवला कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात बॅटिंगने काही खास करता आलं नाही. त्यामुळे वैभव दुसऱ्या सामन्यात मोठी खेळी करुन भारताला विजयासह मालिका जिंकून द्यावा, अशी चाहत्यांची इच्छा आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा