AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 : वर्ल्डकपचा सामना या ठिकाणी होणार असल्याने विराट कोहली खूश, म्हणाला…

वर्ल्डकप 2023 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर प्रत्येक संघ तयारीला लागला आहे. भारतीय संघही सज्ज झाला असून दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली याने निवडलेल्या मैदानावरून आनंद व्यक्त केला आहे.

World Cup 2023 : वर्ल्डकपचा सामना या ठिकाणी होणार असल्याने विराट कोहली खूश, म्हणाला...
| Updated on: Jun 27, 2023 | 8:53 PM
Share

मुंबई : आयसीसी स्पर्धा जिंकून भारतीय संघाला दहा वर्षांचा काळ लोटून गेला आहे. आता वनडे वर्ल्डकपच्या निमित्ताने भारतीय संघाला पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. खासकरून वनडे वर्ल्ड भारतीय भूमीत होत असल्याने भारताला मोठी संधी आहे. आयसीसीने वनडे वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. आजपासून 100 दिवसांनी वर्ल्डकप असणार आहे. क्रिकेट इतिहासात भारत पहिल्यांदाच एकहाती वर्ल्डकपचं आयोजन करणार आहे. यापूर्वी भारताने 1987, 1996 आणि 2011 मध्ये पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशसोबत एकत्र येत स्पर्धेचं आयोजन केलं होतं. आता संपूर्ण वर्ल्डकप भारतात होणार असल्याने भारतीय संघाचे खेळाडू सज्ज झाले आहेत. विराट कोहली यानेही वेळापत्रक जाहीर केल्यानंतर प्रतिक्रिया जाहीर केली आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2019 च्या वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. पण न्यूझीलंडने उपांत्य फेरीत भारताला पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे भारतीय संघाचं वनडे वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं होतं. भारताने शेवटचं आयसीसी जेतेपद महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली 2013 मध्ये जिंकलं होतं. त्यानंतर आतापर्यंत चषकांचा दुष्काळ कायम आहे.

विराट कोहली 2011 वर्ल्डकप संघात खेळला आहे. वानखेडे स्टेडियममध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता.”वैयक्तिकरित्या सांगायचं तर मला मुंबईत खेळायचं आहे. मला 2011 वर्ल्डकप वेळीचा अनुभव पुन्हा एकदा घ्यायचा आहे.”, असं विराट कोहली याने आयसीसीला सांगितलं.

“मी तेव्हा तरुण होतो. मी तेव्हा माझ्या वरिष्ठ खेळाडूंना पाहिलं आहे. मी समजू शकतो कशा प्रसंगातून गेले असतील. वर्ल्डकप होम ग्राउंडमध्ये खेळणं किती खास आहे. ते किती उत्साही होते मी पाहिलं आहे.”, असं विराट कोहली याने सांगितलं.

वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा भारतीय संघाचा सामना क्वॉलिफायर दोन संघासोबत वानखेडे स्टेडियमवर असणार आहे. हा सामना 2 नोव्हेंबर 2023 रोजी असणार आहे. तसेच 15 नोव्हेंबरला उपांत्य फेरीचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.

भारतीय संघ एकूण 9 सामने खेळणार असून मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, पुणे, धर्मशाळा, लखनऊ, कोलकाता आणि बंगळुरु येथे सामना होणार आहे. भारताचा पहिला सामना 9 ऑक्टोबरला चेन्नईला होणार आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?