AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : विराट कोहलीनं टेस्टची कॅप्टनसी सोडली, टीम इंडियाची धुरा कुणाकडं; रोहित की राहुल आणखी कोण? बीसीसीआयपुढं पेचप्रसंग

टी-20 पाठोपाठ विराट कोहलीने (Virat Kohli resign) कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले आहे. त्याने टि्वटवर पोस्ट करुन कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. कालच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी (south Africa test) मालिकेत भारताचा 2-1 ने पराभव झाला होता.

Virat Kohli : विराट कोहलीनं टेस्टची कॅप्टनसी सोडली, टीम इंडियाची धुरा कुणाकडं; रोहित की राहुल आणखी कोण? बीसीसीआयपुढं पेचप्रसंग
विराट कोहली
| Edited By: | Updated on: Jan 16, 2022 | 12:51 PM
Share

नवी दिल्ली : टी-20 पाठोपाठ विराट कोहलीने (Virat Kohli resign) कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले आहे. त्याने टि्वटवर पोस्ट करुन कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. कालच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी (south Africa test) मालिकेत भारताचा 2-1 ने पराभव झाला होता. विराट कोहलीनं राजीनामा दिल्यानंतर टीम इंडियाचा कसोटी कॅप्टन कोण असेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सद्यस्थिती टीम इंडियामध्ये कॅप्टनपद भूषवेल असा खेळाडू नाही. विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर कॅप्टनपद रोहित शर्मा की के. एल. राहुल यांच्याकडे जाणार अशी चर्चा सुरु झालेय. रोहित शर्मा पुढील चार ते पाच वर्ष कसोटी क्रिकेट खेळेल का? असा प्रश्न निर्माण झालाय. तर, के. एल. राहुलकडे कर्णधार म्हणून काम केल्याचा अनुभव कमी असल्यानं बीसीसीआयपुढे (BCCI) नवा प्रश्न निर्माण झालाय.

विराट कोहलीचं ट्विट

विराट कोहलीच्या राजीनामा, नवा कॅप्टन कोण?

विराट कोहलीनं राजीनामा दिल्यानंतर टीम इंडियाचा कसोटी कॅप्टन कोण असेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सद्यस्थिती टीम इंडियामध्ये कॅप्टनपद भूषवेल असा खेळाडू नाही. रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांची नाव चर्चेत आहेत. मात्र, रोहित शर्मा पुढील चार ते पाच वर्ष कसोटी क्रिकेट फिटनेसच्या कारणामुळं खेळेल का? असा सवाल आहे. तर, दुसरीकडे के. एल. राहुल याच्याकडं कर्णधारपद भूषवल्याचा अनुभव कमी आहे.

बीसीसीआयशी वाद?

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराटने पत्रकार परिषद घेतली होती. त्यात कर्णधारपदाच्या विषयावर त्याने भाष्य केलं होतं. त्यावरुन बराच वाद झाला होता. टी-20, आणि वनडेची कॅप्टनशिप सोडू नको, असे आपण विराटला सांगितले होते. असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले होते. पण बीसीसाआयकडून कोणीही आपल्याला कॅप्टनशिप सोडताना अडवलं नाही असं विराटने सांगितलं. त्यामुळे विराट आणि सौरव यांच्या नेमकं खरं कोण बोलतय? असा प्रश्न निर्माण झाला होता.

विराट कोहलीनं टी 20 क्रिकेटचं कॅप्टनपद सोडल्यानंतर तो वनडेचं कर्णधार पद भूषवतं होता. मात्र, बीसीसीआयनं वनडेच्या कॅप्टनपदावरुन विराट कोहलीला हटवलं. त्यानंतर विराट कोहलीनं स्वत:हून कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे चर्चांना उधान आलंय.

विराट कोहलीनं कर्णधार म्हणून काम करताना टीम इंडियाला 40 मॅचेसमध्ये विजय मिळवून दिला. तर, कॅप्टन म्हणून 24 सेंच्युरी केल्या आहेत. कॅप्टन म्हणून त्यानं 5864 धावा केल्या आहेत. विराट कोहलीची ही कामगिरी टीम इंडियाच्या इतर कर्णधारांपेक्षा सरस ठरलीय.

इतर बातम्या:

Virat Kohli Resign: विराटच्या राजीनाम्यानंतर सुनील गावस्करांच अत्यंत स्फोटक विधान

Virat Kohli Test Captaincy : Shocked!! विराटच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर रोहित शर्माची रिअ‍ॅक्शन…

Virat Kohli step down from test captaincy who will next captain Rohit Sharma or K L Rahul BCCI facing problem

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.