AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : पावसामुळे गुयानामध्ये भारत-इंग्लंड सेमीफायनल सामना रद्द झाला, तर मग विजेता कसा ठरणार?

IND vs ENG : येत्या 27 जूनला गुयाना येथील प्रोव्हायडन्स स्टेडियममध्ये भारत-इंग्लंड यांच्यात सेमीफायनल 2 चा सामना होणार आहे. हवामान विभागाने या मॅचच्या दिवशी दिवसभर पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ झाला नाही, मग अशा स्थितीत फायनलसाठी विजेता संघ कसा ठरणार?

IND vs ENG : पावसामुळे गुयानामध्ये भारत-इंग्लंड सेमीफायनल सामना रद्द झाला, तर मग विजेता कसा ठरणार?
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये या सामन्यामध्ये कांगारू जखमी वाघासारखे खेळतील. आजच्या सामन्यात त्यांचा पराभव झाला तर त्यांचे सेमी फायनल सामन्याचे तिकीट बांगलादेश आणि अफगाणिस्तान सामन्यावर अवलंबून राहणार आहे.
| Updated on: Jun 25, 2024 | 10:20 AM
Share

टीम इंडियाने काल सुपर-8 मध्ये ऑस्ट्रेलियाला नमवून दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 24 धावांनी हरवलं. टीम इंडियाने पहिली बॅटिंग करताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 205 धावांचा डोंगर उभारला. यामध्ये कॅप्टन रोहित शर्माचा महत्त्वाचा वाटा होता. त्याने 41 चेंडूत 92 धावा चोपल्या. यात 7 फोर, 8 सिक्स होत्या. टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या 206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 181 धावा केल्या. अशा प्रकारे टीम इंडियाने आरामात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. आता टीम इंडियासमोर सेमीफायनलमध्ये ग्रुप 2 मधून आलेल्या इंग्लंडच आव्हान आहे. 2022 च्या T20 वर्ल्ड कपच्या उपांत्यफेरीत इंग्लंडने टीम इंडियावर एकतर्फी विजय मिळवला होता. त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी टीम इंडियाकडे आहे.

येत्या 27 जूनला गुयाना येथील प्रोव्हायडन्स स्टेडियममध्ये सेमीफायनल 2 चा सामना होणार आहे. या मॅचवर पावसाच सावट आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, भारत-इंग्लंड सेमीफायनल मॅचवर पाऊस पाणी फिरवू शकतो. 27 जूनला गुयानामध्ये दिवसभर पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिवसभर पाऊस कोसळल्यामुळे सामना रद्द झाला, तर मग अशा स्थितीत सेमीफायनलचा निकाल कसा लागणार? फायनलमध्ये कोण प्रवेश करणार भारत की इंग्लंड?

पाऊस कोसळण्याची शक्यता किती टक्के?

अ‍ॅक्यु वेदरने 27 जूनला गुयानामध्ये 88 टक्के पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. 18 टक्के वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिजमधील स्थानिक वेळेनुसार, सकाळी 10.30 वाजता सामना सुरु होणार आहे. एकही चेंडू न टाकता सामना रद्द झाला, तर अशा स्थितीत टीम इंडिया थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. कारण सुपर-8 स्टेजमध्ये टीम इंडिया टॉपवर आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलिया तिन्ही संघांविरुद्ध सामने जिंकले आहेत. पावसामुळे सामना रद्द झाला, तर दुसऱ्या सेमीफायनलचा रिझल्ट असा असेल.

राखीव दिवस नाही का?

गुयानामध्ये सेमीफायनल सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. पण पावसाची शक्यता लक्षात घेऊन सामन्याचा निकाल लावण्यासाठी अतिरिक्त 250 मिनिट देण्यात आली आहेत. पहिला सेमीफायनल सामना त्रिनिदाद येथे होणार आहे.

Follow Us
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!