AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानने आशिया कप जिंकला असता तर काय केले असते? शाहिद आफ्रिदीने केला प्लान उघड

भारताने आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानच्या घशातून विजयाचा घास खेचून आणला. भारतासमोर विजयासाठी 147 धावांचं आव्हा दिलं होतं. पण हे आव्हान भारताने 19.4 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. आशिया कप स्पर्धेच्या जेतेपदावर नवव्यांदा नाव कोरलं.

पाकिस्तानने आशिया कप जिंकला असता तर काय केले असते? शाहिद आफ्रिदीने केला प्लान उघड
पाकिस्तानने आशिया कप जिंकला असता तर काय केले असते? शाहिद आफ्रिदीने केला प्लान उघडImage Credit source: TV9 Network/Kannada
| Updated on: Oct 01, 2025 | 6:06 PM
Share

आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाचा वरचष्मा दिसून आला. भारताने प्रतिस्पर्धी संघांना डोकंच वर काढू दिलं नाही. इतकंच काय तर पाकिस्तानच्या तीनदा पराभवाची धूळ चारली. अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतावर दबाव आणला होता. पॉवर प्लेच्या सहा षटकात भारताचे महत्त्वाचे तीन गडी बाद केले. त्यामुळे टीम इंडिया बॅकफूटवर गेली होती. इतकंच काय धावगतीही जास्त असल्याने हा सामना भारताच्या हातून निसटतो की काय असं वाटत होतं. पण तिलक वर्माने संयमी खेळी केली. धावांची गतीही राखली. संजू सॅमसन आणि शिवम दुबेची त्याला साथ मिळाली आणि विजयश्री खेचून आणला. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास स्पष्ट नकार दिला. पण विचार करा हा सामना पाकिस्तानने जिंकला असता तर त्यांनी काय केलं असतं. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अंतिम सामना जिंकला असता तर पाकिस्तानी खेळाडूंनी तो विजय पाकिस्तानी सैन्याला समर्पित केला असता, असं त्याने सांगितलं.

“अंतिम सामन्यापूर्वी मी त्यांना एक विचार दिला होता. मी त्यांना सांगितले होते की जर ते जिंकले तर त्यांनी तो विजय पाकिस्तान हवाई दलाला समर्पित करावा. पण दुर्दैवाने आम्ही जिंकलो नाही. यामुळे आमचे स्वप्न पूर्ण झाले नाही,” असे शाहिद आफ्रिदी म्हणाला. भारताने या स्पर्धेत पाकिस्तानला तीनदा पराभूत केलं. त्यामुळे भारताचा हेतू स्पष्ट होता की पाकिस्तानला काहीही करून पराभूत करायचं म्हणजे करायचं. त्यामुळे पाकिस्तानला या स्पर्धेत डोकंच वर काढता आलं नाही. आशिया कप स्पर्धेतील या विजयाची नोंद आता इतिहासात होणार आहे.

दरम्यान, भारताने साखळी फेरीतच पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर हा विजय भारतीय सशस्त्र दल आणि पहलगाम पीडितांना समर्पित केला होता. त्यानंतर पीसीबीने सूर्यकुमारची तक्रार आयसीसीकडे केली होती. अंतिम सामना जिंकल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याचे सामना शुल्क भारतीय सैन्याला देण्याचं जाहीर केलं. ‘मी या स्पर्धेतील सर्व सामन्यांमधील माझे सामना शुल्क भारतीय सैन्याला देऊ इच्छितो.’, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.