AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Aus WTC Final : 43 वर्षांपूर्वी ओव्हलवर अशीच स्थिती, आज लाज वाचवण्यासाठी कोण बनणार Sunil Gavaskar ?

Ind vs Aus WTC Final : आज 43 वर्षापूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा दिवस. त्यावेळी विजयासाठी टीम इंडियाला फक्त 8 धावा कमी पडल्या होत्या. सुनील गावस्कर यांनी जबरदस्त प्रदर्श केलं होतं.

Ind vs Aus WTC Final : 43 वर्षांपूर्वी ओव्हलवर अशीच स्थिती, आज लाज वाचवण्यासाठी कोण बनणार Sunil Gavaskar ?
Sunil GavaskarImage Credit source: icc
| Updated on: Jun 11, 2023 | 12:37 PM
Share

लंडन : ICC WTC Final मध्ये टीम इंडियाची स्थिती खराब आहे. मॅचचा आजचा शेवटचा दिवस आहे. टीम इंडियाला विजयासाठी 280 धावांची गरज आहे. पण या धावा करणं सोपं नाहीय. भारताला विजयासाठी 444 धावांच टार्गेट मिळालं होतं. चौथ्या दिवसाचा खेळ संपताना टीम इंडियाने 3 विकेट गमावून 164 धावा केल्या आहेत. भारताचा विजयाचा मार्ग सोपा नाहीय. 1979 साली भारतासमोर अशीच स्थिती होती. द ओव्हलचच मैदान होतं.

त्यावेळी टीम इंडिया जिंकली नव्हती, पण मॅच ड्रॉ करण्यात टीम यशस्वी ठरली होती. त्या मॅचमध्ये लिटिल मास्टर सुनील गावस्कर हिरो ठरले होते.

43 वर्षापूर्वीची आज पुनरावृत्ती होईल का?

टीम इंडियाने मॅच ड्रॉ केली, तर ट्रॉफी टीम इंडियालाच मिळेल. ओव्हलच्या विकेटवर मॅच ड्रॉ करणं सुद्धा कठीण आहे. त्यासाठी आज, टीम इंडियामध्ये कोणाला तरी सुनील गावस्कर बनावं लागेल. 43 वर्षापूर्वी गावस्कर जी इनिंग खेळले होते, तसा खेळ दाखवावा लागेल.

काय घडलेलं त्या मॅचमध्ये?

30 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 1979 रोजी भारत आणि इंग्लंडमध्ये ओव्हलवर कसोटी सामना होता. इंग्लंडने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 305 धावा केल्या. भारतीय टीम आपल्या पहिल्या डावात 202 रन्सवर ऑलआऊट झाली. इंग्लंडने दुसऱ्या डावात 8 विकेट गमावून 334 धावा केल्या. टीम इंडियाला विजयासाठी 438 धावांच टार्गेट मिळालं होतं. भारताने मॅचच्या चौथ्या दिवशी एकही विकेट न गमावता 76 धावा केल्या होत्या. अखेरच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 362 धावांची गरज होती.

विजयासाठी फक्त 8 धावा कमी पडलेल्या

त्या मॅचमध्ये सुनील गावस्कर यांनी जबरदस्त प्रदर्शन केलं होतं. त्यांनी शानदार इनिंग खेळली. डबल सेंच्युरी झळकवली. 443 चेंडूंचा सामना करताना 221 धावा केल्या. सुनील गावस्कर टीमला विजय मिळवून देऊ शकले नाही, टीमला विजयासाठी 8 धावा कमी पडल्या होत्या. भारताने हा सामना ड्रॉ केला होता. आज काहीशी अशीच स्थिती आहे. टीम इंडियाला विजयासाठी 444 धावांच टार्गेट मिळालं. चौथ्या दिवस अखेर टीम इंडियाची स्थिती 3 बाद 164 आहे. विराट कोहली 44 आणि अजिंक्य रहाणे 20 धावांवर नाबाद आहे. टीम इंडियाला विजयासाठी 280 धावांची गरज असून 7 विकेट शिल्लक आहेत.

Follow Us
विश्व मराठी साहित्य संमेलन: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
विश्व मराठी साहित्य संमेलन: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती.
निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!
निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!.
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!.
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा.
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी.
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी.
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार.
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप.
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न.
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न.