AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs IND : मध्यरात्री असं काय घडलं? टीम इंडियाच्या पराभवाचं काय कारण? पाहा VIDEO

139 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजनं 19.2 षटकांत लक्ष्य गाठलं. या सामन्याच्या निकालामुळे वेस्ट इंडिजला मालिकेत बरोबरीचं मैदान मिळालं. दरम्यान, मध्यरात्री असं काय घडलं? याविषयी अधिक जाणून घ्या...

WI vs IND : मध्यरात्री असं काय घडलं? टीम इंडियाच्या पराभवाचं काय कारण? पाहा VIDEO
टीम इंडियाचा पराभवImage Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Aug 02, 2022 | 7:11 AM
Share

नवी दिल्ली : सेंट किट्स येथे खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतावर (IND vs WI) 5 विकेट्सनं मात केली . यजमान संघानं हा सामना 4 चेंडू राखून जिंकला. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजनं टीम इंडियाला (India) प्रथम फलंदाजी दिली. भारतीय संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही आणि 138 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात कॅरेबियन संघानं 139 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 19.2 षटकांत 5 गडी गमावून हे लक्ष्य गाठलं. या सामन्याच्या निकालानं टीम इंडियासाठी (Indian cricket team) अनेक प्रश्न सोडून वेस्ट इंडिजला मालिकेत बरोबरी साधण्याचं काम केले. जेव्हा टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये दुसरा T20 हरत होती, तेव्हा भारत मध्यरात्री येथे झोपला होता. अशा परिस्थितीत तुमचा संघ का हरला, सामन्याच्या कोणत्या टप्प्यावर हरला, कसा हरला हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे. सामन्यात नेमकं काय झालं, याविषयी देखील क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा आहे. याचविषयी आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. जाणून घ्या…

मॅकॉयची भेदक गोलंदाजी

वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज ओबेद मॅकॉयनं भेदक गोलंदाजी केल्यानं भारताचा पराभव झाला. त्यानं भारताचा निम्मा संघ 17 धावांत गुंडाळला. 6 विकेट्ससह, McCoy T20I मध्ये वेस्ट इंडिजचा सर्वोत्तम फिगर गोलंदाज बनला. दुसरीकडे, भारताविरुद्ध कोणत्याही फॉरमॅटमध्ये कोणत्याही कॅरेबियन गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

हा व्हिडीओ पाहा

ब्रेंडन द ‘किंग’

139 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा सलामीवीर ब्रेंडन किंगनं 52 चेंडूत 68 धावा केल्या. 13 षटकांत वेस्ट इंडिजची धावसंख्या 3 बाद 83 अशी असताना त्याने या धावा केल्या. म्हणजेच प्रकरण अडकले होते.

हा व्हिडीओ पाहा

आवेश खानचे शेवटचे ओव्हर का?

शेवटच्या षटकात वेस्ट इंडिजला विजयासाठी 10 धावांची गरज होती. 2 षटके शिल्लक असल्यानं तो भुवनेश्वर कुमारला गोलंदाजी करेल असं सर्वांना वाटत होतं. मात्र कर्णधार रोहित शर्मानं चेंडू आवेश खानकडं सोपवला. पहिल्याच चेंडूवर तो दडपणाखाली आला आणि त्याने नो बॉल टाकला. त्याचा परिणाम असा झाला की, सिक्स मारणाऱ्या वेस्ट इंडिजला फ्री हिट देण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चार आणि सामना तिथेच संपला.

हा व्हिडीओ पाहा

भारतीय फलंदाजी खराब

भारतीय फलंदाजीची अवस्था बिकट दिसत होती. टीम इंडिया पूर्ण ओव्हरही खेळू शकली नाही. 14व्या षटकापर्यंत 4 बाद 104 धावा झाल्या होत्या. पण नंतर पुढील 34 धावांमध्ये उर्वरित 6 विकेट गमावल्या, तेही भारतीय डावाचे 2 चेंडू शिल्लक असताना.

आजच्या सामन्याकडे विशेष लक्ष

मालिकेतील तिसरा सामना या मैदानावर आज म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी होणार आहे. आजच्या सामन्याकडे विशेष लक्ष असेल.

Follow Us
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा