AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? नेमकं काय झालं?

श्रीलंका दौऱ्यात भारतीय वनडे संघाची फारच दैना झाली. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्धची मालिका 2-0 ने गमवावी लागली. दुसरीकडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका खूपच महत्त्वाची आहे. असं असताना जसप्रीत बुमराह कमबॅक करणार की नाही असा प्रश्न आहे.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? नेमकं काय झालं?
| Updated on: Aug 12, 2024 | 2:35 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत भारतीय संघाला एकूण 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. यात बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका, न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका आहे. भारताला अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी 10 पैकी 5 कसोटी सामने जिंकावेच लागणार आहेत. त्यामुळे बांग्लादेश आणि न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका खूपच महत्त्वाची आहे. असं असताना भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात परतणं खूपच आवश्यक आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. रिपोर्टनुसार, टीम इंडियाचे सिलेक्टर्स त्याला बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत आराम देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह आणखी दोन महिने टीम इंडियापासून दूर असेल असं सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत अधिकृत असं काहीच सांगण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, मालिका भारतात होणार आहे. तसेच शमीचं कमबॅक पाहता सिलेक्टर्स तसा निर्णय घेऊ शकतात.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराहला खेळवायचं की नाही, याबाबत निवड समिती विचार विनिमय करू शकते. टीम इंडियाचं शेड्युल पाहूनचं निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. भारताला पुढच्या चार महिन्यात एकूण 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. यात 5 कसोटी सामने ऑस्ट्रेलियात होणार आहेत. त्यामुळे निवड समिती बुमराहबाबत योग्य ती काळजी घेताना दिसत आहे. भारतात फिरकिला मदत करणाऱ्या खेळपट्टी आहेत. तसेच मोहम्मद शमीचं कमबॅक करणार असल्याने बुमराहला आराम देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

जसप्रीत बुमराहला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत आराम दिला गेला तर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत कमबॅक करू शकतो. न्यूझीलंडचा संघ ऑक्टोबर महिन्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या कसोटी मालिकेची सुरुवात 16 ऑक्टोबरपासून होणार आहे. या मालिकेतून जसप्रीत बुमराह मैदानात परतेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे प्रत्येक कसोटी सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. भारताने सलग दोन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एन्ट्री मारली होती. पण दोन्ही वेळेस पदरी निराशा पडली.

मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट..
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट...
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'.
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद.