IND vs ENG: टीम इंडियाचा सतत पराभव होतोय तरीही कॅप्टन श्रेयसचा झाला मोठा फायदा; ‘सरपंच साहब’ला मिळाली सर्वात मोठी गुड न्यूज
भारतीय संघ सध्या टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेत भारतीय संघाचे प्रदर्शन अतिशय वाईट पाहायला मिळाले. भारतीय संघाच्या पराभवानंतरही कर्णधार श्रेयस अय्यचा मोठा फायदा झाला आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. आयर्लंडकडून मालिका 0-2 ने गमावल्यानंतर, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे, ज्यातील चौथा सामना आज खेळला जाईल. भारताला आता ही मालिका जिंकता येणार नाही; मालिका अनिर्णित राखण्यासाठी त्यांना दोन्ही सामने जिंकावेच लागतील. संघाची कामगिरी खराब राहिली असल्याने कर्णधार श्रेयस अय्यरला प्रचंड टीकेचा सामना करावा लागला. संघात इतके तगडे खेळाडू असूनही त्याला संघाकडू हवी तशी कामगिरी काढून घेता आली नाही. पण संघाची कामगिरी वारंवार खराब होऊनही कर्णधार श्रेयस अय्यरला मात्र मोठा फायदा झाला आहे.
संघाची कामगिरी खराब राहिली आहे, परंतु आयसीसी क्रमवारीत 425 स्थानांची झेप घेत अय्यरला वैयक्तिकरित्या फायदा झाला आहे. आयर्लंड दौऱ्यादरम्यान श्रेयस अय्यर दोन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरला. त्याने पहिल्या सामन्यात केवळ 3 धावा आणि दुसऱ्या सामन्यात 10 धावा केल्या. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रेयसने 68 धावांची शानदार खेळी केली, मात्र तो सामना पावसामुळे रद्द झाला. दुसऱ्या सामन्यात कर्णधाराने 37 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, मात्र भारताला तो सामना गमवावा लागला. तिसऱ्या सामन्यात तो केवळ 5 धावाच करू शकला, ज्यात भारतीय संघ 76 धावांवर सर्वबाद झाला.
सूर्यकुमार यादव सध्या टी-20 संघात नाही, ज्यामुळे त्याच्या कामगिरीत सातत्याने घसरण झाली आहे. तो आता टॉप-10 मधून बाहेर पडला आहे. ताज्या आयसीसी क्रमवारीत, सूर्याने टी-20 फलंदाजी क्रमवारीत 8 व्या स्थानावरून 13 व्या स्थानावर झेप घेतली आहे. इंग्लंडचा जेकब बेथेल देखील सात स्थानांची झेप घेत टॉप-10 मध्ये 8 व्या स्थानावर पोहोचला आहे. ईशान किशन टी-20 फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी कायम असून, अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या 5 फलंदाजांमध्ये कोणताही बदल नाही.
वरुण चक्रवर्तीला धक्का
फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केलेली नाही. त्याने 35 धावा दिल्या आणि त्याला एकही बळी मिळाला नाही. दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने एक बळी घेतला पण 37 धावा दिल्या. आयसीसी टी20 गोलंदाजी क्रमवारीत वरुण तिसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरला आहे, तर जसप्रीत बुमराह देखील दोन स्थानांनी खाली आला आहे. सध्या टी20 आंतरराष्ट्रीय सामने न खेळणारा तो आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. अफगाणिस्तानचा रशीद खान पहिल्या क्रमांकावर कायम आहे.