IND vs PAK : पाकिस्तानचं गणित कुठं चुकलं? वाचा पराभवाची 5 कारणे

Why Pakistan Lost : भारताने टी 20 वर्ल्डकप 2026 मध्ये पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला आहे.टी-2 वर्ल्डकपच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्ध भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. पाकिस्तानच्या पराभवाची कारणे जाणून घेऊयात.

| Updated on: Feb 15, 2026 | 11:24 PM
1 / 5
नाणेफेक जिंकून गोलंदाजी :  या महामुकाबल्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र इशान किशनच्या आक्रमक फटकेबाजीमुळे त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला.

नाणेफेक जिंकून गोलंदाजी : या महामुकाबल्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र इशान किशनच्या आक्रमक फटकेबाजीमुळे त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला.

2 / 5
शाहीनने नाराज केले : पाकिस्तानची ताकद ही त्यांची गोलंदाजी आहे, मात्र या सामन्यात त्यांचा प्रमुख गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने नाराज केले. त्याने दोन ओव्हरमध्ये 31 धावा देत केवळ एक विकेट घेतली.

शाहीनने नाराज केले : पाकिस्तानची ताकद ही त्यांची गोलंदाजी आहे, मात्र या सामन्यात त्यांचा प्रमुख गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने नाराज केले. त्याने दोन ओव्हरमध्ये 31 धावा देत केवळ एक विकेट घेतली.

3 / 5
फिरकीपटूंना फेल : सॅम अयुब सोडता पाकिस्तानच्या इतर फिरकी गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. शादाबने एका षटकात 17 धावा दिल्या, अबरारने तीन षटकांत 38 आणि नवाजने चार षटकांत 28 धावा दिल्या.

फिरकीपटूंना फेल : सॅम अयुब सोडता पाकिस्तानच्या इतर फिरकी गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. शादाबने एका षटकात 17 धावा दिल्या, अबरारने तीन षटकांत 38 आणि नवाजने चार षटकांत 28 धावा दिल्या.

4 / 5
उस्मान तारिक अपयशी : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी उस्मान तारिक आणि त्याच्या गोलंदाजीमुळे चर्चेत आला होता. कर्णधार सलमान आघाने त्याला ट्रम्प कार्ड म्हटले होते, मात्र तो निष्प्रभ ठरला. त्याने चार षटकांत 24 धावा देऊन फक्त एक विकेट घेतली.

उस्मान तारिक अपयशी : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी उस्मान तारिक आणि त्याच्या गोलंदाजीमुळे चर्चेत आला होता. कर्णधार सलमान आघाने त्याला ट्रम्प कार्ड म्हटले होते, मात्र तो निष्प्रभ ठरला. त्याने चार षटकांत 24 धावा देऊन फक्त एक विकेट घेतली.

5 / 5
बुमराहने टॉप ऑर्डरची झोप उडवली : पाकिस्तानसमोर 176 धावांचे लक्ष्य होते, मात्र जसप्रीत बुमराहने एकाच षटकात दोन विकेट्स घेत पाकिस्तानची झोप उडवली. भारताकडून हार्दिक, बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत विजय संघाला विजय मिळवून दिला.

बुमराहने टॉप ऑर्डरची झोप उडवली : पाकिस्तानसमोर 176 धावांचे लक्ष्य होते, मात्र जसप्रीत बुमराहने एकाच षटकात दोन विकेट्स घेत पाकिस्तानची झोप उडवली. भारताकडून हार्दिक, बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत विजय संघाला विजय मिळवून दिला.