AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार : शाहिद आफ्रिदी

या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार भारतीय संघच असल्याचं पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचं म्हणणं आहे. एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आफ्रिदीला एक संघ निवडायचा होता. त्याने भारतीय संघ निवडला.

भारतीय संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार : शाहिद आफ्रिदी
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jun 22, 2019 | 6:48 PM
Share

लाहोर : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात अनेक रंगतदार लढती पाहायला मिळत आहेत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि भारत हे संघ शानदार फॉर्मात आहेत. पण या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार भारतीय संघच असल्याचं पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचं म्हणणं आहे. एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आफ्रिदीला एक संघ निवडायचा होता. त्याने भारतीय संघ निवडला.

समोर प्रश्न विचारण्यासाठी पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर होता. विश्वचषक कोण जिंकेल, असा प्रश्न आफ्रिदीला विचारण्यात आला. त्यावर आफ्रिदी म्हणाला, “मी आतापर्यंत जेवढे सामने पाहिले आहेत, त्यानुसार भारतीय संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार वाटतो. पूर्वी त्यांची गोलंदाजी कमकुवत असायची.”

भारतीय संघाची फलंदाजी तर नेहमीच चांगली होती. पण सध्या त्यांच्या गोलंदाजीमध्ये धार आली आहे. तुम्ही त्यांच्या गोलंदाजांकडे पाहा. कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल युवा असूनही अत्यंत समजदारपणे गोलंदाजी करतात आणि ते कौतुकास पात्र आहेत. शिवाय वेगवान गोलंदाजीमध्येही भारतीय संघ आता चांगला आहे, असंही आफ्रिदी म्हणाला.

इंग्लंडमधील खेळपट्टीवर ज्या गोलंदाजीची गरज असते, त्याच पद्धतीची गोलंदाजी भारतीय संघाकडून केली जात आहे. मला वाटतं की भारतीय संघासोबत इंग्लंडचा संघही फायनलपर्यंत मजल मारु शकतो. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी आहे, असा अंदाज आफ्रिदीने व्यक्त केला.

या विश्वचषकात अनेक रंगतदार सामने पाहायला मिळत आहेत. श्रीलंकेने अत्यंत कमी धावसंख्येचं आव्हान दिलेलं असतानाही इंग्लंडला हरवलं, तर दुसरीकडे अफगाणिस्तानने भारतीय फलंदाजांना जेरीस आणत केवळ 224 धावांवर रोखलं. 10 संघांच्या गुणतालिकेत सध्या ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि भारत हे अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.

Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत;  उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर....
Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!
तटकरेंचा तट तोडून आले! भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
Chhagan Bhujbal | तटकरेंचा तट तोडून आले! राज्यसभा अर्जावेळी भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...