AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर धूळ चारण्याची भारतात क्षमता : VVS

सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर : टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना गमावला असला तरी टीम इंडियामध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत करण्याची क्षमता आहे. तसेच भारतीय संघ मजबूत आणि संतुलित असल्याने ऑस्ट्रलियाला धूळ चारू शकतो, असा विश्वास भारताचे माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी व्यक्त केला. नागपुरात आयोजित स्पोर्ट्स […]

ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर धूळ चारण्याची भारतात क्षमता : VVS
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM
Share

सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर : टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना गमावला असला तरी टीम इंडियामध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत करण्याची क्षमता आहे. तसेच भारतीय संघ मजबूत आणि संतुलित असल्याने ऑस्ट्रलियाला धूळ चारू शकतो, असा विश्वास भारताचे माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी व्यक्त केला.

नागपुरात आयोजित स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन या कार्यक्रमाच्या वार्षिक क्रीडा पुरस्कार सोहळयाप्रसंगी लक्ष्मण बोलत होते.

“आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळात यश संपादन करणं, हे माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासारखं आहे. त्यामुळे सर्वच खेळाडू शिखर गाठतील असं नाही. त्यासाठी कठोर मेहनत आणि सातत्य ठेवल्याशिवाय यश मिळत नाही.” असा मंत्र लक्ष्मण यांनी दिला.

अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हे सूत्र ज्या खेळाडूच्या लक्षात येतं तोच खेळाडू कधीही अपयशाला घाबरणार नाही. परिस्थिती कशीही असो, देशासाठी खेळणारा प्रत्येक खेळाडू एखाद्या योद्ध्याप्रमाणेच खिलाडू वृत्तीने खेळतो. यश हे एका रात्रीतून मिळणार नाही, त्यासाठी त्याग, मेहनत आणि खेळात सातत्य टिकवणे सर्वात महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारताला पहिल्या टी-20 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. मेलर्बन येथील दुसरा टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे भारत मालिकेत 1-0 ने मागे आहे. असं असलं तरी या भारतीय संघ तिसऱ्या टी-20 सामन्यात कमबॅक करत मालिकेत बरोबरी साधेलस, असा विश्वास लक्ष्मणला आहे.

 ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, रिषभ पंत (यष्टिरक्षक), कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, खलील अहमद

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत, पार्थिव पटेल, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक

कसोटी मालिका

पहिला सामना – 6 डिसेंबर

दुसरा सामना – 14 डिसेंबर

तिसरा सामना – 26 डिसेंबर

चौथा सामना – 3 जानेवारी

वन डे मालिका

पहिला सामना – 12 जानेवारी

दुसरा सामना – 15 जानेवारी

तिसरा सामना – 18 जानेवारी

Follow Us
मराठा उपसमितीची विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक
मराठा उपसमितीची विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक.
संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी
संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी.
एफआयआर दाखल होणार का? सीआयडीच्या भूमिकेवर रोहित पवारांचं प्रश्नचिन्ह
एफआयआर दाखल होणार का? सीआयडीच्या भूमिकेवर रोहित पवारांचं प्रश्नचिन्ह.
युद्धखोरांविरोधात उभं राहायची सत्ताधाऱ्यांची हिंमत नाही; राऊतांची टीका
युद्धखोरांविरोधात उभं राहायची सत्ताधाऱ्यांची हिंमत नाही; राऊतांची टीका.
राष्ट्रीय फुटबॉल ट्रायल्सचा पहिला दिवस खानिकर स्टेडियममध्ये पार पडला
राष्ट्रीय फुटबॉल ट्रायल्सचा पहिला दिवस खानिकर स्टेडियममध्ये पार पडला.
फडणवीस मांडणार राज्याचा अर्थसंकल्प; आर्थिक पाहणी अहवाल काय?
फडणवीस मांडणार राज्याचा अर्थसंकल्प; आर्थिक पाहणी अहवाल काय?.
ते त्यांच्या पक्षाचे संस्कार! संजय राऊतांची ज्योती वाघमारेंवर टीका
ते त्यांच्या पक्षाचे संस्कार! संजय राऊतांची ज्योती वाघमारेंवर टीका.
दुबईत अडकलेले खासदार कल्याण काळे अखेर संभाजीनगरमध्ये परतले
दुबईत अडकलेले खासदार कल्याण काळे अखेर संभाजीनगरमध्ये परतले.
व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांची 8 तास CID चौकशी!
व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांची 8 तास CID चौकशी!.
अजित पवारांची खूप आठवण येतेय; पार्थ पवारांचं भावनिक ट्विट
अजित पवारांची खूप आठवण येतेय; पार्थ पवारांचं भावनिक ट्विट.