AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मित्रांनो, आता अलार्म बंद करा, बिनधास्त झोपा : विराट कोहली

सिडनी: विराट कोहलीच्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला आहे. भारताने तब्बल 72 वर्षांनी ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. चौथ्या सिडनी कसोटीत भारताचा विजय निश्चित होता, मात्र सलग अडीच दिवस पाऊस कोसळल्याने ऑस्ट्रेलिया लाजिरवाण्या पराभवापासून वाचली. सिडनी कसोटी अनिर्णित राहिली. त्यामुळे भारताने कसोटी मालिका 2-1 अशी खिशात घातली. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा भारत […]

मित्रांनो, आता अलार्म बंद करा, बिनधास्त झोपा : विराट कोहली
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM
Share

सिडनी: विराट कोहलीच्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला आहे. भारताने तब्बल 72 वर्षांनी ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. चौथ्या सिडनी कसोटीत भारताचा विजय निश्चित होता, मात्र सलग अडीच दिवस पाऊस कोसळल्याने ऑस्ट्रेलिया लाजिरवाण्या पराभवापासून वाचली. सिडनी कसोटी अनिर्णित राहिली. त्यामुळे भारताने कसोटी मालिका 2-1 अशी खिशात घातली.

ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा भारत हा आशियातील पहिला संघ ठरला आहे. तर विराट कोहली हा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा पहिला कर्णधार बनला. ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहलीच्या चेहऱ्यावर आनंद, अभिमान झळकत होता.

कोहली म्हणाला, “सर्वात आधी सांगू इच्छितो की, या टीमचा भाग असणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. याच मैदानावरुन आमच्या संघात बदलाची प्रक्रिया सुरु झाली. मी कर्णधारपद सांभाळलं आणि चार वर्षांनी या मैदानावर विजय मिळवता आला. या संघाचं नेतृत्त्व करण्याबाबत एकाच शब्दात सांगेन – अभिमान. संघाचं नेतृत्त्व करणं ही माझ्यासाठी सन्मानजनक बाब आहे. माझ्या टीममधील मुलांनी कर्णधाराचं काम सोपं केलं”.

पुढे कोहली म्हणाला, “हे माझ्या करियरमधील सर्वात मोठे यश आहे. ही मालिका जिंकल्याने खूपच भावूक आहे. आम्ही 2011 मध्ये विश्वचषक जिंकला, तेव्हा मी संघातील सर्वात युवा खेळाडू होतो. त्यावेळी मी सहकाऱ्यांना भावूक होताना पाहिलं, मात्र तेव्हा मी भावूक झालो नव्हतो. मी ऑस्ट्रेलियाचा तीनवेळा दौरा केला, इथल्या विजयाचं महत्त्व वेगळंच आहे. या विजयाचा आम्हाला अभिमान आहे”.

यावेळी कोहलीने चेतेश्वर पुजारा आणि युवा फलंदाज मयांक अग्रवालचं तोंडभरुन कौतुक केलं. आम्ही फलंदाजीवर लक्ष केंद्रित केलं, छोट्या छोट्या बाबींवर काम केलं. मी पुजाराबाबत विशेष उल्लेख करेन. पुजाराने संपूर्ण मालिकेत जबरदस्त कामगिरी केली. तो आपल्या कौशल्यावर सातत्याने काम करत असतो. तो टीममधील जबरदस्त फलंदाज आहे, असं कोहली म्हणाला.

याशिवाय कोहलीने मयांक अग्रवालचं कौतुक केलं. बॉक्सिंग डे कसोटीत मयांकने चॅम्पियनप्रमाणे फलंदाजी केली. तो मैदानावर लढवय्यासारखा उभा राहिला, असं कोहली म्हणाला.

दुसरीकडे कोहलीने गोलंदाजांचीही तोंडभरुन स्तुती केली. गोलंदाजांनी या मालिकेसाठी ज्याप्रकारे तयारी केली, फिटनेसवर लक्ष दिलं आणि विजयाची मानसिकता बनवली ती निश्चितच कौतुकास्पद आहे, असं कोहलीने सांगितलं.

आमचा संघ तरुण आहे, आजचा विजय ही शिखर गाठण्यासाठी महत्त्वाची पायरी आहे. हा विजय शानदार आहे, असं कोहलीने नमूद केलं.

पुढे कोहलीने ऑस्ट्रेलिया संघाचंही कौतुक केलं. ऑस्ट्रेलियाचा संघही भविष्यात चांगलं काम करेल, असं तो म्हणाला.

या विजयाचा जल्लोष दीर्घकाळापर्यंत करु. आमच्या टीममधील खेळाडू शारिरीक आणि मानसिकरित्या थकले आहेत. आता कोणालाही सकाळी लवकर उठण्यासाठी गजर लावण्याची गरज नाही, असं कोहली म्हणाला. दुसरीकडे कोहलीने प्रेक्षकांचेही आभार मानले.

Follow Us
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत;  उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर....
Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!